शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव गट निर्माण करण्यात संत्रा उत्पादक असमर्थ

By admin | Updated: October 3, 2016 00:43 IST

कारंजा (घा.) : महाराष्ट्रात ६० हजार हेक्टरमध्ये द्राक्ष, ४० हजार हेक्टरमध्ये डाळींब तर दीड लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते; पण शासनाचे संत्रा उत्पादनाकडे फारसे लक्ष नाही.

सभेचा सूर : संत्र्यांच्या गुणवत्तावाढीवर झाली चर्चाकारंजा (घा.) : महाराष्ट्रात ६० हजार हेक्टरमध्ये द्राक्ष, ४० हजार हेक्टरमध्ये डाळींब तर दीड लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते; पण शासनाचे संत्रा उत्पादनाकडे फारसे लक्ष नाही. शासनावर प्रभाव गट निर्माण करण्यास संत्रा उत्पादक असमर्थ ठरला आहे यामुळेच संत्रा उत्पादकांची दुरवस्था झाली आहे, असा सूर युवा संत्रा उत्पादकांच्या सभेत उमटला.महाआॅरेंज संस्थेतर्फे येथील संत्रा निर्यात व प्रक्रिया केंद्रावर युवा संत्रा उत्पादकांची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाआॅरेंजचे अध्यक्ष अनंत धारड तर अतिथी म्हूणन सुधीर जगताप, विवेकानंद अतकरे, श्रीधर ठाकरे, प्रशांत कुकडे, नामदेव खेरडे, मनोज जवंजाळ, उद्धव बडे, शिवाजी खवशी, राहुल ठाकरे उपस्थित होते. आष्टी, आर्वी, वरूड, कांरजा, अचलपूर येथील युवा संत्रा उत्पादकांनी चर्चेत भाग घेतला.धारड यांनी संत्रा उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी उत्तम दर्जाच्या कलमा तयार केल्या पाहिजे. विविध जातीचे संशोधन केले पाहिजे. ‘सी ग्रेड’ संत्रावर प्रक्रिया करून ज्यूस तयार केला पाहिजे. यातून उत्पादन वाढेल, असे सांगितले. जगताप यांनी संत्र्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. कलमा तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान तालुका स्तरावर पोहोचले पाहिजे. किड नियंत्रण, आहार व जल व्यवस्थापन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. अतकरे यांनी चिकू या पिकाबद्दल अनुभव कथन केले. संचालक श्रीधरराव ठाकरे यांनी २००८ मध्ये स्थापन महाआॅरेंज संस्थेचा संत्रा उत्पादकांच्या विकासात कसा उपयोग झाला, हे सांगितले. संचालन जंवजाळ यांनी केले. उत्पादकांनी बैठकीबद्दल समाधान व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)