शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

दोन आठवड्यापासून सीसीआयचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भर : कटनीच्या व्यवहारातून लाखोंची उलाढाल

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मागील दोन आठवड्यापासून सीसीआयच्यावतीने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आतापर्यंत केवळ २५ व २६ नोव्हेंबर या दोन दिवसांचे चुकारे देण्यात आले आहेत. तर उर्वरित दिवशी शेतमाल विक्री करणारे शेतकरी सीसीआयच्या कार्यालयात येरझारा मारत आहेत. सीसीआयच्या लेटलतीफ कारभारामुळे शेकडा अडीच टक्क्यांच्या व्यवहारातून सध्या लाखोंची उलाढाल होत आहे. असे असले तरी या व्यवहारात मात्र शेतकरीच नाडला जात आहे.कापूस उत्पादक काही कास्तकारांनी सातबारा आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने चुकाऱ्यांना वेळ होत असल्याचे सीसीआयच्यावतीने सांगण्यात येत आहे. येथील केंद्राच्यावतीने सीसीआयच्या अकोला कार्यालयाकडे अद्यापही कापसाचे देयक न पाठविल्यामुळे चुकाऱ्यांबाबतची अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे नगदी व्यवहारासाठी दलालांना शेकडा अडीच टक्के कटनी देवून कापसाचे व्यवहार होत आहे.यासाठी बाजार समितीचे आवारात शंभरच्या घरात दलालांनी गर्दी केल्याचे दिसून येते. त्यांच्या मार्फत दररोज लाखोंच्या व्यवहाराची उलाढाल होत आहे. या सर्व प्रकारात कास्तकार नाडला जात आहे. मंगळवारपर्यंत देवळी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांच्यावतीने २३ हजार ७०६ क्विंटल व सीसीआयच्यावतीने २१ हजार ६५२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयची खरेदी उशीरा सुरू झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत खरेदी कमी झाली.सीसीआयचेवतीने कापसातील आद्रता पाहुन प्रती क्विंटल ५५५०, ५४९४, ५४३९ व ५३२८ पर्यंतचे भाव दिले जात आहेत. खासगी व्यापाºयांच्यावतीने ५,३३० ते ५००० पर्यंतचे भाव दिले जात आहेत. सीसीआयचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याने याचा फायदा खासगी व्यापारी व दलालांना होत आहे. आधीच परतीच्या पावसामुळे कास्तकार अडचणीत सापडला आहे. कापसाच्या त्या प्रमाणात उतारे नाही तर सोयाबीनचे पीक अरजले नाही. अशा स्थितीत त्याची आर्थिक कोंडी झाली आहे. कापसाचे पीक पावसात सापडल्याने तसेच यातील आद्रतेमुळे भावबाजीत शेतकरी नाडला जात आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता अधिकाºयांनीही योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.नियोजनशून्य कारभाराचा फटकासीसीआयच्यावतीने बºयापैकी भाव मिळत असले तरी या कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकºयांचे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याची ओरड सध्या होत आहे. अकोला कार्यालयाकडे टप्प्याटप्प्याने देयक पाठविली जात नसल्याने गेल्या सोळा दिवसांपासूनचे चुकारे थकले आहेत. सीसीआय प्रशासनाने याकडे लक्ष देवून तातडीने योग्य पाऊल उचलण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :cottonकापूस