शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

दोन दशकांपासून हिंदूबहुल गावाचे नेतृत्व मुस्लिम कुटुंबाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM

देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे.

ठळक मुद्देरत्नापूर गावात नांदतोय सामाजिक एकोपा

हरिदास ढोक।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल्या की, जाती-पातीचे राजकारण आलेच. त्यातून विरोधकांचा गटही सक्रीय होऊन गावामधील एकोपा आणि शांततेलाही बाधा निर्माण होते. पण, हिंदू बहूल असलेल्या गावामध्ये एकच मुस्लिम कुटूंब असताना गावकऱ्यांनी एक-दोन वर्षे नाही तर तब्बल २० वर्षे गावाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी ते मुस्लिम परिवार मोठ्या खंबिरपणे पेलून गावाच्या विकासात भर घालत आहे.देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अयुब अली पटेल यांचे एकमेव घर आहे. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासापोटी गेल्या तीस वर्षांपासून त्यांची ग्रामपंचायतमध्ये सत्ता आहे. त्यापैकी वीस वर्ष ेअयुब अली पटेल व त्यांची पत्नी शाहीन अंजूम यांनी सरपंचपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आताही शाहीन अंजूम या सरपंचपदाची निर्भिडपणे धुरा सांभाळत आहे. कोरोना काळात सरंपच आणि सदस्यांना ग्रामस्थांचे पाठबळ असल्याने गाव कोरोनामुक्त राहिले आहे. गेल्या तीन दशकांपासून या गावात सर्वधर्म समभावावी प्रभावीपणे रुजवण होत असल्याने हे गाव इतर गावांसाठी नक्कीच पे्ररणादायी ठरणारे आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत