शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

आदिवासी माना बांधवांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:55 PM

अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देअन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली. सदर मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर शहर पोलिसांनी अडविल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.संविधानातील ३४२ व्या कलमानुसार तसेच अनुसूचित जाती/जमाती सुधारणा कायदा १९६५ व १९६७ नुसार राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये १८ व्या क्रमांकावर माना जमातीची नोंद आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक ९५९/२००२ दि. ११ जुलै २००३ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचिका क्र. ५२७०/२००४ दि. ८ मार्च २००६ चा निर्णय माना जमातीच्या बाजूने असताना राज्य सरकारने माना जमातीचा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंबंधी शासन निर्णय काढले होते.त्यानुसार सदर जमातीला प्रमाणपत्रही प्राप्त होत होते. परंतु, त्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली, नागपूर, अमरावती यांनी माना जमातीचे जात वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे प्रलंबित ठेवलेली आहेत. हे एक प्रकारे अन्याय करण्याचे षडयंत्रच असल्याचा आरोप करीत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सदर मोर्चाने बजाज चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.या मोर्चात माना आदिम जमात मंडळ व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच आदिवासी माना समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आमचा लढा फक्त जात वैधतेसाठीजात वैधता आमच्या हक्काची..., लोकशाही की ठोकशाही..., गुंज उठा है कोणा-कोणा जाग उठा है आदिवासी माना आदी घोषणा देत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी माना समाज बांधवांनी आमचा लढा फक्त जात वैधतेसाठी असा आवाज बुलंद केला. सदर आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.