शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:37 IST

गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपला. तरी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज वर्धा जिल्ह्यातील......

ठळक मुद्देसत्याग्रह आंदोलन : आदेशाची अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंड गोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपला. तरी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आज वर्धा जिल्ह्यातील आदिवासी गोवारी बांधवांनी मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत सत्याग्रह आंदोलन केले.राज्यातील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वषार्पासून लढत आहे. आपल्या न्याय मागणीसाठी ११४ गोवारीचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयात प्रकरणसुद्धा दाखल केले होते. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर न्याय मिळाला. आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, या मागणीसाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर सत्याग्रह आंदोलनांचा दुसरा टप्पा पार पडला. ११४ शहीद गोवारी स्मारकाच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर पोलिस मुख्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन मूकमोर्चाला सुरुवात करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आदिवासी गोवारी समाजाच्या महीला, पुरुष व विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येकाने पिवळा शेला परिधान केला होता. जय सेवा , जय गोवारी, गोवारी एकता जिंदाबाद , गर्व से कहो हम आदिवासी हैं, भारत के मुल निवासी हैं, अशा घोषणा देऊन मूकमोर्चाला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना निवेदन देतांना सुधाकर चामलाटे, देवराव पदिले, घनश्याम भीमटे, नरेश लोहट, रोशन राऊत, राजकुमार ठाकरे, दिनेश कुसराम, मंगेश एम. चौधरी, राजू राऊत, सोनु राऊत, ताराचंद नेवारे, विक्की लसुंते, सागर बोरजे, मोहन राऊत, रुपराव राऊत, साधना नेहारे, मधुकर राऊत, संतोष राऊत, निरंजन गुळभेले, विजय बोरजे, संजय नेहारे, रोशन दुधकोहळे, रोशन राऊत, लक्ष्मण राऊत, कृष्णाजी वाघाडे व तालुक्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हा मोर्चा अडविण्यात आला होता.त्यानंतर या मूकमोर्चातील आदिवासी समाज बांधवांचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांच्या नावे विविध मागण्यांचे निवेदन दिले.