शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली

By admin | Updated: November 2, 2016 00:43 IST

गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात.

विभागाचे दुर्लक्ष : वहिवाट झाली धोक्याची कारंजा (घा.) : गोळीबार चौकातून उमरी - येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून पादचाऱ्यांना ये जा करणे कठीण झाले आहे. परिणामी, किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत.शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून १५ गावांतील नागरिक ये-जा करीत असतात. कारंजा गोळीबार चौकातून उमरी-येनगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये येणारे ग्राहक राजरोसपणे दुकानांसमोर भररस्त्यावर वाहने उभी ठेवतात. यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही बाब नित्याची झाली आहे. पायी चालणेही कठीण जात असल्याने अनेकदा अपघातही झाले आहेत. दक्षता कमिटीच्या सभेमध्ये ठाणेदारांना अनेकवार या गंभीर समस्येची जाणीव करून देण्यात आली; पण अद्याप कोणतीही कारवाई वाहने वा वाहन चालकांवर झालेली नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावर कारवाई करणार काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.दुकानदारही ग्राहकांना वाहने रस्त्यावर ठेवू नका, अशा सूचना देत नाहीत. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक धोक्याची झालेली आहे.(तालुका प्रतिनिधी)१५ गावातील नागरिकांसाठी हाच रस्ताकारंजा गोळीबार चौक हा शहरातील मुख्य चौक आहे. हा रस्ता आसपासच्या १५ गावांना जोडणारा आहे. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते; पण मार्गावरील दुकानांमध्ये खरेदीकरिता आल्यावर वाहनतळाची सोय नसल्याने कुठलाही विचार न करता वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे उर्वरित चिंचोळ्या मार्गावरून इतर वाहन चालकांना वाट काढावी लागते. परिणामी, अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर अपघाताचा धोका कायमशहरातील मुख्य रस्ता असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. बसेसही याच मार्गाने ये-जा करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहेत. शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत घेऊन या मार्गावरून जावे लागते. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे; पण ते या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत रस्त्यावर वाहने उभी ठेवून वाहतूक रोखणाऱ्यांवर कारवाई करण्यास तयार नाही. यामुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो.