शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

चोर आला आला.. गेला गेला..

By admin | Updated: November 16, 2014 23:09 IST

शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. केवळ रात्रीच नाही तर भर दिवसाही चोऱ्या होवू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. यात शहरात रात्रीच्यावेळी

शहरात भीती : रात्री पोलिसांची नाही तर नागरिकांची गस्तवर्धा : शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. केवळ रात्रीच नाही तर भर दिवसाही चोऱ्या होवू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. यात शहरात रात्रीच्यावेळी विविध भागात खास करून शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे), सिंदी (मेघे) कारला या भागात चोर आल्याच्या अफवेने चांगलीच धूम केली आहे. यात रात्री पर्यंत संपूर्ण परिसरात नागरिकांची चोर आला... चोर गेला... म्हणत पळापळ सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत महिनाभरापासून शहरात चोऱ्यांच्या घटनांनी चांगलाच उधम माजला आहे. एकाच रात्री नऊ घरफोड्या झाल्याच्या घटनेपासून शहरात व शहरालगतच्या परिसरात चोरट्यांची दहशत कायम झाली आहे. या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसताना सिंदी (मेघे) परिसरात येत असलेल्या देहनकर ले-आऊट येथे भर दिवसा सकाळी १० वाजताच्या सुमारास चोरट्यांनी महिला घरी एकटी असल्याचे पाहून तिला बांधून तिच्या घरी चोरी केली. यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली. चोरी त्या परिसरात रात्रीला पोलिसांची गस्त असल्याचे सांगण्यात आले. रात्री गस्त आटोपून पोलीस पाठमोरे होताच चोरट्यांनी सकाळी हात साफ केला. यामुळे पोलिसांचा या चोरट्यांवर काहीच वचक नसल्याची चर्चा आहे. या घटनेने शहरवासीयात चांगलीच दहशत पसरली असताना शुक्रवारी सायंकाळी स्वागत कॉलनीत रात्री ८ वाजताच्या सुमारास एक इसम एका घराच्या छतावरून दुसऱ्या छतावर जाताना दिसला. यामुळे नागरिकांनी चोर आला.. चोर आला.. म्हणून आरडा ओरड सुरू केली. ही आरडा ओरड रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तपासाच्या नावावर केवळ दुचाकीने दोन पोलीस आले. तेही वरवर पाहणी करून निघून गेले. मात्र भयभीत झालेल्या नागरिकांनी हातात लाठ्या काठ्या घेवून जागली केली. याच रात्री परिसरातील काही नागरिकांनी हनुमान टेकडीच्या परिसरात हातात टॉर्च घेवून झडती घेतली. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नसले तरी त्यांच्या मनातील भीती मात्र कायम आहे. पोलीस चोर पकडण्याच्या प्रत्नात असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्या हाती तो येत नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत पोलीस या चोरट्यांना जेरबंद करीत नाही तोपर्यंत नागरिकांच्या मनात तयार झालेली भीती जाणे शक्य नसल्याची चर्चा आहे. अशातच रात्री एखाद्या सभ्य व्यक्तीलाही मार खाण्याची वेळ येण्याची शक्यता नाकरता येत नाही. पोलिसांकडून चोर पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीला गस्तही वाढली आहे. शिवाय नागरिकांनी लाठ्या काठ्या घेवून रस्त्यावर येणे टाळावे असे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)