शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी तालुक्यातील २८ पाणीदार गावे होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी फाऊंडेशनच्या यावर्षीच्या स्पर्धेबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी डॉ. पोळ बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जलसंधारण अधिकारी गेहलोत, .....

ठळक मुद्देअविनाश पोळ : वॉटर कप स्पर्धेचा दुसरा टप्पा; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात पाण्याची चळवळ उभी करणारे पाणी फाऊंडेशन यावर्षी वॉटर कप स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू करीत आहे. पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या आणि पाणीदार झालेल्या गावांसाठी ही स्पर्धा असून यात पाण्याचा विवेकी वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देऊन त्यावर ‘समृद्ध गाव’ अशी स्पर्धा घेण्यात येईल. वर्धा जिल्ह्यातील २८ गावांचा या स्पर्धेत सहभाग राहणार असून स्पर्धेच्या कालावधीत ते ‘समृद्ध’कडे वाटचाल करणार आहेत, अशी माहिती पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी फाऊंडेशनच्या यावर्षीच्या स्पर्धेबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी डॉ. पोळ बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जलसंधारण अधिकारी गेहलोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनील इंगळे तसेच पाणी फाऊंडेशनचे वर्धा येथील प्रतिनिधी उपस्थित होते.डॉ. पोळ पुढे म्हणाले, राज्यातल्या ४० तालुक्यातील १ हजार १०० गावांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्गाची शाळा हा उपक्रम असेल. यामध्ये शालेय मुलांवर लहानपणीच निसर्गाबद्दलचे संस्कार रुजविणे, त्यांच्यामध्ये निसर्गाप्रती ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच गाव शिवारातील गवत, जंगल आणि मातीचा सेंद्रीय कर्ब वाढविणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पीक घेणे, निसर्गाचे संवर्धन करून गावातील माणसाला समृद्ध करणे असा या स्पर्धेचा उद्देश असून स्पर्धा ५०० गुणांची राहणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील २८ गावांचा समावेश यात करण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात पाणी आणि पर्यवारणाबद्दल चांगली जागृती आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात यासाठी चांगला सहभाग मिळेल. तसेच या गावांमध्ये सामूहिक प्रयत्नातून प्राधान्यक्रमाने शासनाच्या योजना राबवता येईल. गाव पातळीवर प्रेरणादायी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. योग्य काम झाल्यास उद्देश साध्य होईल, असे जिल्हाधिकारी भिमनवार म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी