शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

जिल्ह्यात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण झाले ४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM

आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार २०४ स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ९५३ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ९ हजार ६१५ अहवाल निगेटिव्ह आलेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २८६ असून रविवारी ६ जण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत २३६ कोरोनामुक्त झाले असून ८ जणांचा कोरोनाने मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. तर एक जण इतर आजाराने मरण पावला.

ठळक मुद्दे३२५ व्यक्ती आसोलेशनमध्ये : ५,२४३ गृहविलगीकरणात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मार्च महिन्यापासून तब्बल ५० दिवस कोरोना मुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील आर्वी शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून जिल्ह्यात रविवारपर्यंत ४० कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. तर ३२५ व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने आसोलेशनमध्ये ठेवले असून अजूनही ५ हजार २४३ व्यक्तींना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.रविवारी १६५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. त्यात जिल्ह्यात १२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. १३७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३२५ रुग्ण आसोलेशनमध्ये असून रविवारी १४३ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारने आता भाजी विक्रेते व दुकानदार यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले आहे. मात्र वर्धा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच आर्वीसाठी या योजनेची अंमलबजावणीही सुरू केली होती. त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासन देशातही कोरोना मुक्तीच्या दृष्टीकोनातून अग्रेसर कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार २०४ स्त्राव नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ९ हजार ९५३ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यातील ९ हजार ६१५ अहवाल निगेटिव्ह आलेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २८६ असून रविवारी ६ जण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत २३६ कोरोनामुक्त झाले असून ८ जणांचा कोरोनाने मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. तर एक जण इतर आजाराने मरण पावला. जिल्ह्यात सध्या ४० अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून ७० हजार ९१२ गृहविलगीकरण करण्यात आले आहे.सध्या ५ हजार २४३ जण गृह विलगीकरणात आहेत. तर २९१ संस्थात्मक विलगीकरणात आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा अभ्यास करून त्याबाबत अहवाल तयार करण्याची जबाबदारी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थान सेवाग्राम यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यासाठी ४ हजार किट उपलब्ध होणार असून २ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे. कोरोनाची सिरो सर्वेक्षण करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा असावा असे सांगण्यात आले आहे.वर्धेकर बिनधास्तच!वर्धा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. मात्र, वर्धेकरांसह प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी बिनधास्तच आहेत. अनेक जण अद्याप मूळ गावाहून ये-जा करीत कोरोना बाधितांच्या संख्येत भर घालत आहेत. यावर ना प्रशासनाचे ना संबंधित कार्यालयातील विभागप्रमुखाचे नियंत्रण आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या