शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

नागपूर-भुसावळ प्रवासी रेल्वेगाडी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:42 PM

नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी केले.धरणे आंदोलनादरम्यान जोरदार नारेबाजी करून शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्विकारले. बंद करण्यात आलेली नागपूर-भूसावळ पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल व सिलेंडर यांची झालेली भाववाढ तातडीने मागे घेण्यात यावी. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात जाचक ठरत असलेली सिव्हीलची अट रद्द करून त्वरीत कर्ज पुरवठा करण्यात यावा. सरसकट संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली चाराटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यात याव्यात. पीक विम्यातील घोळाची चौकशी करून संबंधित कंपन्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे नुकसान टाळण्याकरिता वनविभागाने योग्य पावले उचलावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. शिवाय येत्या १५ दिवसात या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.