शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

ई-पंचायतपासून सरपंच अनभिज्ञ

By admin | Updated: September 29, 2014 00:49 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या ई-पंचायत कारभाराने राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा व गावांचा कारभार अतिशय पारदर्शक झाला आहे़ यामुळे कामांनाही गती मिळाली आहे़ काही ठिकाणी मात्र या योजनेचा

देवकांत चिचाटे - नाचणगावराज्य शासनाने सुरू केलेल्या ई-पंचायत कारभाराने राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा व गावांचा कारभार अतिशय पारदर्शक झाला आहे़ यामुळे कामांनाही गती मिळाली आहे़ काही ठिकाणी मात्र या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे़ ई-पंचायत या संकल्पनेची ग्रामस्थ तर सोडा काही पदाधिकाऱ्यांनाही कल्पना नाही़ शासनाच्या इ-पंचायत संकल्पनेपासून आजही जवळपास ४० टक्के अधिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.ग्रामविकास विभागाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक गतिमान व पारदर्शक व्हावा यासाठी इ-पंचायत ही संकल्पना शासनाच्यावतीने राबविण्यात आली. ती राबविताना काही त्रुटी व तांत्रिक बाबींचा मोठ्या दिमाखाने वापर करून त्याचा दुरूपयोग करण्याचे काम सुरू आहे. आजही ग्रामीण भागात दुर्लक्षित अशा बहुतांश भागात ग्रा़पं़ मध्ये ही संकल्पना व्यवस्थित पोहोचली नसल्याचेच दिसून येते. त्या पोहोचल्याचा केवळ देखावा मात्र करण्यात आला आहे़ ग्रा़पं़ मधील संग्राम कक्षामध्ये कार्यरत असलेल्या डाटा आॅपरेटरला हाताशी धरून एक समांतर ग्रामपंचायत चालविली जात आहे़ ग्रामपंचायतचे शिपाई व कारकून नवीन प्रणालीपासून दूर असल्याचेच यावरून दिसून येते़ ग्रामपंचायत निधीतून लाखो रुपये खर्चाच्या कामांचे ई-टेंडर कसे काढण्यात येते, हे आजही बऱ्याच सरपंचांना माहिती नाही. यामुळे इ-पंचायत यशस्वी होताना दिसत नाही़