शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

गांधी जिल्ह्यात रस्ता अपघाताने घेतले १८७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:00 AM

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते.

ठळक मुद्दे१७६ गंभीर जखमी : मृतांमध्ये पुरुषांची संख्या जास्त

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करा असे आवाहन सर्वच स्तरातून केले जात असले तरी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत गांधी जिल्ह्यात झालेल्या ४८८ रस्ते अपघातांमध्ये १८७ व्यक्ती ठार झाल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाले. दिवसेंदिवस वाढत असलेले अपघात लक्षात घेऊन यंदाच्या ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान वाहतूक नियमांचे पालन कसे गरजेचे आहे याविषयी प्रभावी जनजागृती होण्याची गरज आहे.दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. वाहतूक नियमांकडे पाठ दाखविणाऱ्या अनेकांवर वर्षभऱ्यात दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु, तरुण मंडळी वाहतूक नियमांना फाटाच देत असल्याचे चित्र बघावयास मिळते. परिणामी, तरुणांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वर्षभºयात जिल्ह्यात एकूण ४८८ रस्ते अपघात झाले असून यात १८७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७१ पुरूष तर १६ महिलांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात आले.५७ अपघातात सुदैवाने दुखापत टळलीजिल्ह्यातील ९२ अपघातांमध्ये १७६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. तर ५७ अपघातांमध्ये सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. असे असले तरी वाहनांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.पोलिसी कारवाईबाबत गैरसमज कायमअपघात झाल्याचे निदर्शनास आल्यावर काही व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना मदत करतात. तर काही व्यक्ती तेथून पळ काढण्यातच धन्यता मानतात. अपघातातील जखमींना मदत केल्यास आपणही पोलिसांच्या कार्यवाहीत अडकू असा गैरसमज अजूनही कायम असल्याने तो कसा दूर करता येईल याविषयी रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रभावी काम होणे गरजेचे आहे.एकाचाही गौरव नाहीअपघात झाल्याचे लक्षात येताच अनेक नागरिक घटनास्थळी गर्दी करतात. नागरिकांच्या या गर्दीतील काहीच व्यक्ती सामाजिक बांधिलकी जोपासत जखमींना रुग्णालयात दाखल करतात. परंतु, पोलीस विभाग असो वा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून जखमीला रुग्णालयापर्यंत नेणाºया अशा एकाही व्यक्तीला आतापर्यंत गौरविण्यात आले नसल्याची शोकांतीका आहे.

टॅग्स :Accidentअपघात