शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल प्राप्त; बाधित नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आहे. प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास या संकटातून सुखरुप बाहेर पडता येईल.

ठळक मुद्देप्रयोगशाळेत पाठविलेले नऊही अहवाल निगेटिव्ह : सतर्कता हाच या आजारावर एकमेव उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा विषाणू सर्वत्र पाय पसरत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करुन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे. परिणामी आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आहे. प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास या संकटातून सुखरुप बाहेर पडता येईल.जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या नागपूर व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने वेळीच सावधगिरी बाळगून उपाययोजना सुरु केल्या. सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासह शाळा, महाविद्यालये बंद करुन प्रारंभी आपत्कालीन परिस्थिती घोषीत केली. त्यानंतर रविवारी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला. त्याला जनेतेनेही सर्वत्र उदंड प्रतिसाद दिला. मात्र, दुसऱ्या दिवशीच पुन्हा नागरिकांनी घराबाहेर पडून बेजबाबदारपणाचे दर्शन घडविले.या आजाराला सहज न घेता सजग राहण्याचे आवाहन होत असतानाही नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे विषाणूला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाने संचारबंदी लागू केली.यासोबतच जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या आहे. आता कोरोना विषाणूचा कठीण काळ सुरु झाला असून या लढाईत जिंकण्यासाठी सर्वांनी धावण्याची नाही तर घरीच थांबण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग स्वत: चा जीव धोक्यात घालून सर्वांसाठी प्रयत्नरत असताना नागरिकांनीही आपल्या सहकार्याची साथ देण्याची गरज आहे. त्याकरिता प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.बाहेरगावावरुन आलेल्यांची घरोघरी जाऊन आरोग्य विभाग करतोय तपासणी- कोरोना बाधित क्षेत्रातूर्न जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर प्रशासनाची करडी नजर आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती जिल्ह्यात आल्याची आरोग्य विभागाकडे नोंद आहे. त्यापैकी ७४ व्यक्तींची आतापर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली. उर्वरित ३५ व्यक्ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पण, त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय चमू लक्ष ठेऊन आहे. आरोग्य विभागाने प्रारंभी तीन, नंतर पाच, त्यानंतर एक असे एकूण ९ व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता पाठविले होते. या सर्वांचेच नमुने निगेटिव्ह आले आहे.- यासोबतच जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई यासह इतरही मोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या गावाकडे परत आले आहे. त्यांची आकडेवारी ग्रामपंचायत सरपंच व पोलिस पाटलांकडून घेऊन आरोग्य सेविका व वैद्यकीय अधिकारी त्यांची तपासणी करीत आहे. त्यांच्यावर १४ दिवसापर्यंत लक्ष ठेऊन आहे.आतापर्यंत तीन टप्प्यात ९ व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. त्यांनी सूचनांचे पालन करुन घराबाहेर न पडता घरातच आपला वेळ घालवावा.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या