शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या वादळामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत आहे.

ठळक मुद्देउन्हाळवाही की जांभूळवाही? : शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला पेच

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : प्रखर उष्णतामानाच्या मे महिन्यात सातत्याने येत असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळित होत आहे. उन्हाळवाही पूर्णत: नाहीशी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्यामुळे शेतातील गोठे आणि घरांची पडझड झाली. जनावरांसाठी सहा महिने पुरेल एवढ्या वैरणाची व्यवस्था करून ठेवलेल्या असंख्य शेतकऱ्यांजवळ असणारा चारा शेतातच ओलाचिंब झाल्याने वैरणाचे संकट ओढवले आहे. गोठ्यांची डागडुजी करण्यात व्यस्त शेतकºयांना रात्रीच्या वेळी येणाऱ्या वादळामुळे जीव मुठीत धरून बसावे लागत आहे. खरिपाची तयारी म्हणून शेतकऱ्यांनी शेताचे सपाटीकरण केले आहे. मात्र, पाऊस येत असल्याने नांगरणी केलेल्या शेतात रण वाढणार आहे. त्यासाठी पुन्हा नांगरणीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. जमिनीची धूप झाली नसल्याने खरीप हंगामात पीक उतारा देईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वादळामुळे विजेच्या तुटलेल्या तारा व खांबाची दुरस्ती सुरू असली तरी दर दिवसाआड येत असलेल्या वादळाने पुन्हा जैसे थे स्थिती होत आहे. शेतीकामात अडथळा येत आहे. पेरणीवेळी करावी लागणारी जांभूळवाही आताच करावी, का असा प्रश्न उभा ठाकत आहे. या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा अधिक होणार असल्याचे बोलले जात असल्याने या पिकाच्या पेरणीला अजून एक महिन्याचा वेळ आहे. अशात केलेली उन्हाळवाही येणाऱ्या पावसामुळे नेस्तनाबुत झाल्याने शेतकऱ्यांना दुबार खर्चाला सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस