शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक ठप्प पडत होती. वाहनधारकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागत होते.

ठळक मुद्देआधी लॉकडाऊन, आता रेल्वेने बदलविले डिझाईन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बजाज चौकातील उड्डाणपुलाच्या बांधकामात अगोदर कोरोना लॉकडाऊनने, तर आता रेल्वेने आपल्या हद्दीत पुलाचे डिझाईन बदलविल्याने खोडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक ठप्प पडत होती. वाहनधारकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागत होते. वेळोवेळी मागणीनंतर पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. २९ कोटी रुपयांचा निधी पूल बांधकामाकरिता मंजूर झाला. या पुलाचे दोन-तीन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झाले. काम गतीने सुरू असतानाच मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे काम बंद पडले. दरम्यानच्या काळात मजूरवर्गही स्वगावी गेल्याने काम आणखीच रेंगाळले.जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शासनाने शसकीय आणि खासगी बांधकामांना परवानगी दिली. आचार्य विनोबा भावे यांच्या नावे ओळखल्या जाणारा हा उड्डाणपूल रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो.सद्यस्थितीत पुलाचे ३० ते ४० टक्के काम झाले आहे. आता मध्येच रेल्वेने उड्डाणपुलाचे डिझाईन बदलविण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या हद्दीत मध्यभागात उड्डाणपुलाचे डिझाईन बदलले आहे.त्यामुळे पुलाची इतर बारीकसारीक कामे उरकविली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. रेल्वेने पुलाचे संपूर्ण डिझाईनच बदलल्यास कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागणार आहे.उड्डाणपुलावर मेगाब्लॉक नित्याचावर्धा शहराला जोडणारा आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गत काही वर्षांपासून पुलाची दुर्दशा झालेली आहे. हिंगणघाट, यवतमाळकडे याच उड्डाणपुलावरून वाहतूक होते. उड्डाणपूल आधीच अरुंद त्यातच वाहनांच्या वाढत्या संख्येचा भार यामुळे उड्डाणपुलावर सातत्याने वाहतुककोंडी होत होती. यामुळेच पूल बांधकामाची मागणी झाली आणि कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा