शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

शंभर एकरावरील रबी हंगाम धोक्यात

By admin | Updated: December 2, 2014 23:10 IST

निम्न वणा प्रकल्पातील घोळ वर्धा जिल्ह्याच्या सेलू, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पातही लागू होत असल्याचे विदाराक वास्तव आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या

सिंचन घोटाळा : समुुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील व्यथा
सिंदी (रेल्वे) : निम्न वणा प्रकल्पातील घोळ वर्धा जिल्ह्याच्या सेलू, समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पातही लागू होत असल्याचे विदाराक वास्तव आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामचलावू प्रवृत्तीमुळे नजीकच्या गौळ (भोसा) वितरिकेच्या परिसरात असलेल्या १६ शेतऱ्यांना दीड दशकानंतरही सिंचनासाठी पाणी मिळाले नाही.
सांडवा क्रमांक सातची काळजी घेण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. २१ आॅगस्ट २००९ रोजी नंदू देशपांडे व इतरांनी त्यांच्या शेतात धरणाचे पाणी पोहचत नाही, अशी तक्रार दिली होती; मात्र निगरगट्ट शाखा अभियंत्याने त्या तक्रारीतची दखल घेतली नाही, असे देशपांडे यांच्यासह अनेकांचे गाऱ्हाणे आहे.
नागपूर जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्याच्या उपरोक्त तिन्ही तालुक्यात सिंचन व्हावे व विदर्भ सुजलाम् सुफलाम् व्हावा, या उद्देशाने वणा नदीवर वडगावजवळ निम्न वणा प्रकल्प उभारण्यात आला. लोकशाही आघाडी सरकारने २००४ पासून या प्रकल्पाच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेत. मात्र, धरणाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचले नाही. प्रकल्पाच्या पानचऱ्या, सांडवे, कालवे तयार करताना अनेक नियमबाह्य कामे झालीत. भलत्याच जागी गेट देण्यात आले. नको तेथे पुल बांधून ठेकेदारांना जगविण्यात आल्याची ओरड आहे.
पाच वर्षांपूर्वी २१ आॅगस्ट ०९ रोजी नंदू उर्फ नरेंद्र देशपांडे यांनी त्यासंदर्भात विस्तृत तक्रार सादर केली आहे. पण आश्वासनापुढे कवडीची प्रगती झाली नाही, अशी त्यांची कैफियत आहे. सिंचन घोटाळ्यामुळे चौकशी होणार, या धास्तीपायी गौळ मायनरकडे लक्ष पुरविण्याची उसंत अधिकाऱ्यांना मिळत नाही, असे एका अधिकाऱ्याने नकळत सांगून टाकले आहे.(प्रतिनिधी)