शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

३१.९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कापूस खरेदी केंद्र गाठून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देनागपूर, अमरावती, यवतमाळातील शेतकऱ्यांच्या कापसाची आवक सुरू

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत टोकण धारक अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री केल्याचे पुढे आले आहे. तर आतापर्यंत टोकण धारकांसह इतर १ लाख ७३ हजार ७१९ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ३१.९४ लाख क्विंटल कापूस सीसीआय आणि कापूस पणन महासंघ तसेच कृषी उत्पन्न बाजार समितींना विकल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सध्यास्थितीत वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस वर्धा जिल्ह्यातील सीसीआय आणि कापूस पणन महासंघाच्या केंद्रांवर खरेदी केला जात आहे.खरीप हंगाम २०१९-२० या कालावधीत वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती कापसाचे उत्पादन होईल याबाबतचा कृषी विभागाचा यंदा अंदाज चुकला. त्यातच कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही दिवस कापूस खरेदी केंद्रही बंद होते. परंतु, नंतर शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शिवाय जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कापूस खरेदी केंद्र गाठून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. तसेच संबंधितांना सूचना केल्या. परिणामी, अवघ्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी केंद्रांपर्यंत पोहोचून त्याची विक्री झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ७१९ शेतकऱ्यांचा ३१ लाख ९४ हजार ८६६.७० क्विंटल कापूस आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्यात सीसीआची खरेदी अंतिम टप्प्यात आहे.१२,६४३ शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशातसीसीआय व कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्रीसाठी तब्बल ५० हजार १३४ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून नोंदणी केली होती; पण लॉकडाऊननंतरही अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक असल्याची ओरड झाल्याने अचूक माहिती घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान टोकण धारक तब्बल १२ हजार ६४३ शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकल्याची बाब पुढे आल्याने त्यांचे टोकण रद्द करण्यात आले आहे. यावर्षी व्यापाऱ्यांचा कापसाचा भाव २ हजार ८०० ते ४ हजार ३०० होता. त्यामुळे अनेकांनी सीसीआयलाच कापूस देणे पसंत केले.पणनचे दोन तर सीसीआयचे दहा केंद्रकापूस पणन महासंघाच्या दोन तर सीसीआयच्या दहा केंद्रांवर कापूस खरेदी केला जात आहे. २,४५२ शेतकरी शिल्लक असून जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी कापूस विकल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शिल्लक असलेल्या २ हजार ४५२ शेतकऱ्यांपैकी काहींनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.बाहेर जिल्ह्यातील ७३९ शेतकऱ्यांचा खरेदी होतोय कापूसअमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या पुलगाव आणि देवळी येथील केंद्रांवर तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील शेतकऱ्यांचा कापूस सेलू येथील केंद्रावर सध्या खरेदी केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील २५५, यवतमाळ जिल्ह्यातील ३२९ तर नागपूर जिल्ह्यातील १५५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :cottonकापूस