शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत पीककर्ज द्या

By admin | Updated: June 17, 2016 02:31 IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करताना सर्व बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.

किशोर तिवारी : संयुक्त बैठकीत सूचनावर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करताना सर्व बॅँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. बॅँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बॅँकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर तिवारी बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, अग्रणी बॅँक प्रबंधक विजय जांगडा, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिककर्ज देताना खासगी सावकाराकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना करताना तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८० टक्केपेक्षा अधिक शेतकरी कृषी कर्जांतर्गत यावे यासाठी अडीच लाख रुपर्यांपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज पुनर्गठणाची सुविधा असल्याने अद्याप कर्ज न घेतलेले व ज्यांना कर्ज हवे आहे, अशा सर्व शेतकरी खातेदारांना कर्ज उपलब्ध करून द्या, असे निर्देश बॅँकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. पिककर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरवून दिले असले तरी कर्ज मागणीसाठी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळेपर्यंत अर्ज वाटप सुरू ठेवा. यासाठी कमीत कमी वेळेत व त्वरित कर्ज मिळेल, अशी पद्धत लागू करा. जिल्ह्यात कर्ज वाटपामध्ये दिरंगाई करणाऱ्या बँक व्यवस्थापकांविरूद्ध कार्यवाही करण्याचे निर्देशही तिवारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेत.(कार्यालय प्रतिनिधी)शासकीय अनुदान कपात करू नकाशेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कर्ज वसुली केली आहे, अशा शेतकऱ्यांची वसूल केलेली रक्कम त्वरित संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करा. यापुढे शासकीय अनुदान कर्ज खात्यात वळते करू नका, अशा स्पष्ट सूचना यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.पिककर्जाबाबत आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेताना ते पूढे म्हणाले की, प्रत्येक बँकांनी पिककर्ज वाटप सुरू आहे, याबाबत ठळकपणे दिसेल, असे फलक लावावे. त्यावर शाखा व्यवस्थापकाचे सर्व प्रमुख दूरध्वनी शेतकऱ्यांसांठी उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले. बॅँकांनी कर्ज पुरवठा करताना शेतकरी कर्जासाठी बॅँकेत येतील याची प्रतीक्षा न करता प्रत्येक गावातील शेतकरी सदस्यांच्या यादीनुसार प्रथम कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बॅँकेच्या कक्षेत आणून त्यांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा. बॅँकांनी यापुढे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन पिककर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वागत करून प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यात ४ हजार ३७७ शेतकरी सदस्यांचे ४५ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. २७ हजार २७७ शेतकऱ्यांना २९१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले असून येत्या सात दिवसांत १०० कोटींचे कर्ज वाटप पूर्ण होईल. ३० जूनपर्यंत सरासरी ७०० कोटींचे कर्ज वाटप पूर्ण करून जिल्ह्यात ८० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध होईक़ यासाठी प्रत्येक बँकांनी सुटीच्या दिवशीही बॅँका सुरू ठेवून कर्ज वाटप करावे. कर्ज वाटपासाठी आवश्यक असलेले सातबारा, आठ अ तसेच आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध करून देण्यात येत आहे. कर्ज पुरवठ्यासंदर्भात तहसीलदारांनी नियमित आढावा घेऊन प्रत्येक बॅँकनिहाय माहिती घ्यावी, असेही तिवारी यांनी सांगितले. अग्रणी बॅँक प्रबंधक विजय जांगडा यांनी बॅँकनिहाय कर्ज वितरणाबाबत दिलेले उद्दीष्ट व कार्यवाहीबाबत माहिती दिली.