शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत १६६ शेतकऱ्यांना स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 5:00 AM

महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२ लाख ४८ हजार खातेधारक : प्रायोगिक तत्त्वावर लोणी, येणगावची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यातून आतापर्यंत जवळपास ६० हजार खातेधारकांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. डाटा अपलोड करण्याचे काम सुरु असून आज राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर निवडक जिल्ह्याच्या प्रत्येकी दोन गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यात वर्धा जिल्ह्याच्या दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांच्या समावेश आहे.महाराष्ट्रात सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जाच्या खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असेलली व परतफेड न झालेली २ लाखांपर्यतची रक्कम माफ करण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना मिळावा याकरिता जिल्हानिहाय खातेधारकांची माहिती मागविण्यात आली आहे.त्यानुसार वर्धा जिल्ह्यात २ लाख ४८ हजार खातेधारक असून आतापर्यंत ६० हजार खातेधारकांची सर्व माहिती गोळा करुन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. शासनाने आज प्रायोगित तत्त्वावर पहिली यादी जाहीर करण्यात आली.याकरिता देवळी तालुक्यातील लोणी व कारंजा (घाडगे) तालुक्यातील येणगाव येथील १६६ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकºयांना आता प्रमाणिकरण करुन घ्यावे लागणार आहे. यासाठी महसूल विभाग आणि बँकेचे कर्मचारी कामाला लागले आहे. त्यामध्ये काही त्रुट्या असल्यास दुरुस्ती करण्यात येणार आहे.९९ शेतकऱ्यांची झाली ओळखपरेडपहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता आधार कार्ड, बँक पासबूक, यादीत नमुद असलेला मोबाईल क्रमांक, यादीत नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक लिहून जवळच्या आपले सरकार केंद्र, बँक शाखा किंवा स्वस्त धान्य दुकानावर आपले प्रमाणिकरण करायचे आहे. आतापर्यंत पहिल्या यादीतील १६६ शेतकऱ्यांपैकर ९९ शेतकºयांनी प्रमाणिकरण केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे येत्या दोन ते तीन दिवसात प्रमाणिकरण केले जाणार आहे.२८ फेब्रुवारीनंतर दुसरी यादी होणार जाहीरपहिली यादी ही प्रायोगिक तत्त्वावर जाहीर केली असून यात काय अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी किती कालावधी लागतो याचा अभ्यास केला जाणार आहे.पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण झाल्यानंतर लगेच २८ फेबु्रवारीला दुसरी यादी जाहीर होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नवीन हगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन पुढील शेतीकरिता पीककर्ज घेणे सुलभ व्हावे, या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.