शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांची साफसफाई व रुंदीकरण करण्याची गरज

By admin | Updated: June 19, 2016 01:52 IST

पावसाला सुरूवात होत आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली.

भाजपाची मागणी : मुख्याधिकारी यांना निवेदन सादरपुलगाव : पावसाला सुरूवात होत आहे. मृग नक्षत्रात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुढील धोका ओळखून नाल्यांची स्वच्छता व रुंदीकरण करावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. शहरातील नाल्यांची नियमितपणे स्वच्छता होत नाही. गांधी चौक, बरांडा परिसर, हिंगणघाट फैल, दखनी फैल, टिळक नगर आदी भागात साफ सफाई करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात नाल्या तुंबून पाणी साचून राहात असल्याचा प्रकार दरवर्षी पहावयास मिळतो. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका असतो. या सर्व बाबीचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरात स्वच्छता व जनजागृती मोहीम राबवावी, तसेच याबाबत जनजागरण मोहीमही देखील राबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर न्यायालयालगतच्या नाल्याचे रुंदीकरण करण्याची मागणी भाजपाच्या वतीने पालिका मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना करण्यात आली. शिष्टमंडळात सचिव नितीन बडगे, श्रवण तिवारी, मानसिंग झांझोटे, अविनाश जायदे, विशाल धोपाडे, झाडे आदींचा सहभाग होता.(तालुका प्रतिनिधी)नाल्यांच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रोहणा - गावातील नाल्या कचरा व गाळाने बुजल्या आहेत. त्यांची स्वच्छता करण्याबाबत मागील तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत सदस्य संदीप सुटे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. असे असतानाही त्यांच्या सूचनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सुटे यांनी केला आहे. पावसाच्या आधी गावातील तुंबलेल्या नाल्या साफ करणे अत्यावश्यक आहे. नाल्यांची स्वच्छता न केल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका असतो. ही गंभीर बाब लक्षात घेवून ग्रामपंचायत सदस्य संदीप सुटे यांनी तीन महिन्यांपासून सरपंच व ग्रामसचिव यांना नाल्यांची स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक मासिक सभेत ही मागणी लावून धरली. पण ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळा तोंडावर येऊनही एकही गोष्ट कृतीत उतरविली नाही. पावसाळ्यात नाल्या तुंबून त्यात डासांची पैदास होते. परिणामी आजार पसरण्याचा धोका हा जास्त असतो. ही बाब लक्षात घेऊन आधी स्वच्छता उपक्रम हाती घेणे गरजेचे झाले आहे. दलीत वस्तीतील नाल्यांचे बांधकामही वर्षभरापासून केलेले नाही. सुचविलेल्या कामाकडे ग्रा.पं. प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत ते रोखून धरत असस्ल्याचा आरोपही सुटे यांनी केला आहे.(वार्ताहर)