शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गडकरींसमोर आमदार बापाच्या अश्रूंचा बांध फुटला, सांत्वनपर भेटीत अनेकांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:53 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या.

वर्धा - जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 7 युवक जागीच ठार झाले. या घटनेत गोंदियाचे भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या 25 वर्षीय अविष्कार या मुलाचेही निधन झाले. घटनेनंतर अनेक लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे. तर, रहागडाले यांची सांत्वनपर भेटही घेत आहेत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रहांगडाले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, आमदार विजय रहांगडाले यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या. आपला 25 वर्षांचा तरुण मुलगा अपघातात गमावल्याने दु:खाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला आहे. त्यातच, वडिल विजय यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. त्यांची ही पोस्ट वाचून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. त्यातच, आज नितीन गडकरी यांनी भेट देताच, पुन्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. या भावनिक आणि दु:खीप्रसंगी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. 

वर्धा येथील अपघाताची घटना खूप दुर्भाग्य पूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्यासह परिवारासोबत त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलो. रहांगडाले कुटुबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो, अशा शब्दात गडकरींना भावना व्यक्त केल्या. 

अपघातासाठी चौकशी समिती गठीत

अपघात कसा झाला, त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना. तसेच, ऑटोमोबाईलमुळे तर ही दुर्दैवी घटना घडली नाहीना, या सगळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी (road safety) बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल, असेही गडकरींनी यावेळी म्हटले. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात (accident) मृत्यू पावतात. तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यात ५० टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले असुन ५० टक्के अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो, याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी म्हटले. 

पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला शोक

'महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावे -

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएसनितेश सिंग, २०१५ इंटर्न एमबीएएसविवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट १ प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २शुभम जयस्वाल, २०१७ एमबीबीएस फायनल पार्ट २पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट १ 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgondiya-acगोंदियाwardha-acवर्धाAccidentअपघातMLAआमदार