शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींसमोर आमदार बापाच्या अश्रूंचा बांध फुटला, सांत्वनपर भेटीत अनेकांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:53 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या.

वर्धा - जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 7 युवक जागीच ठार झाले. या घटनेत गोंदियाचे भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या 25 वर्षीय अविष्कार या मुलाचेही निधन झाले. घटनेनंतर अनेक लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे. तर, रहागडाले यांची सांत्वनपर भेटही घेत आहेत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रहांगडाले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, आमदार विजय रहांगडाले यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या. आपला 25 वर्षांचा तरुण मुलगा अपघातात गमावल्याने दु:खाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला आहे. त्यातच, वडिल विजय यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. त्यांची ही पोस्ट वाचून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. त्यातच, आज नितीन गडकरी यांनी भेट देताच, पुन्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. या भावनिक आणि दु:खीप्रसंगी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. 

वर्धा येथील अपघाताची घटना खूप दुर्भाग्य पूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्यासह परिवारासोबत त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलो. रहांगडाले कुटुबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो, अशा शब्दात गडकरींना भावना व्यक्त केल्या. 

अपघातासाठी चौकशी समिती गठीत

अपघात कसा झाला, त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना. तसेच, ऑटोमोबाईलमुळे तर ही दुर्दैवी घटना घडली नाहीना, या सगळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी (road safety) बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल, असेही गडकरींनी यावेळी म्हटले. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात (accident) मृत्यू पावतात. तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यात ५० टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले असुन ५० टक्के अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो, याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी म्हटले. 

पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला शोक

'महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावे -

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएसनितेश सिंग, २०१५ इंटर्न एमबीएएसविवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट १ प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २शुभम जयस्वाल, २०१७ एमबीबीएस फायनल पार्ट २पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट १ 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgondiya-acगोंदियाwardha-acवर्धाAccidentअपघातMLAआमदार