शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

गडकरींसमोर आमदार बापाच्या अश्रूंचा बांध फुटला, सांत्वनपर भेटीत अनेकांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:53 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या.

वर्धा - जिल्ह्यातील सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात 7 युवक जागीच ठार झाले. या घटनेत गोंदियाचे भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या 25 वर्षीय अविष्कार या मुलाचेही निधन झाले. घटनेनंतर अनेक लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे. तर, रहागडाले यांची सांत्वनपर भेटही घेत आहेत. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी रहांगडाले कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, आमदार विजय रहांगडाले यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या. आपला 25 वर्षांचा तरुण मुलगा अपघातात गमावल्याने दु:खाचा डोंगर कुटुंबीयांवर कोसळला आहे. त्यातच, वडिल विजय यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. त्यांची ही पोस्ट वाचून अनेकांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. त्यातच, आज नितीन गडकरी यांनी भेट देताच, पुन्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. या भावनिक आणि दु:खीप्रसंगी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. 

वर्धा येथील अपघाताची घटना खूप दुर्भाग्य पूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्यासह परिवारासोबत त्यांच्या कुटुबियांना भेट देण्यासाठी आलो. रहांगडाले कुटुबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो, अशा शब्दात गडकरींना भावना व्यक्त केल्या. 

अपघातासाठी चौकशी समिती गठीत

अपघात कसा झाला, त्यासाठी चौकशी समिती गठीत केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनियरचे कारण तर नाही ना. तसेच, ऑटोमोबाईलमुळे तर ही दुर्दैवी घटना घडली नाहीना, या सगळ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आम्हाला रोड सेफ्टी (road safety) बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल, असेही गडकरींनी यावेळी म्हटले. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात (accident) मृत्यू पावतात. तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यात ५० टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले असुन ५० टक्के अपघात मृत्यूवर नियंत्रण केलेले आहे. महाराष्ट्रात (maharashtra) कशा प्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो, याबाबत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी म्हटले. 

पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला शोक

'महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी झालो आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावे -

नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएसनितेश सिंग, २०१५ इंटर्न एमबीएएसविवेक नंदन २०१८, एमबीएबीएस फायनल पार्ट १ प्रत्युश सिंग, २०१७, एमबीबीएस फायनल पार्ट २शुभम जयस्वाल, २०१७ एमबीबीएस फायनल पार्ट २पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट १ 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgondiya-acगोंदियाwardha-acवर्धाAccidentअपघातMLAआमदार