शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

कोरडवाहू कापूस उत्पादकांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:25 IST

यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे.

ठळक मुद्देओलिताखाली कापसाचे उत्पन्न दीडपट : लहान व्यापाऱ्यांचे ‘अच्छे दिन’, शासनाचे खरेदी केंद्र बंदच

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे. शासनाच्या हमीभावाची खरेदी अद्यापही सुरू झालीच नसल्याने शासकीय धोरणाचा फज्जा उडाल्याचे वास्तव्य आहे. आष्टी तालुकाच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात कुठेही हमीभावाची खरेदी सुरू झाली नाही.पावसाळा संपल्यावर सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने पीक उत्पादनावर परिणाम होण्याचे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. कपाशीवर दह्या, कवडी, मुळकुज, करपा, बोंडावरील काळे ठिपके, पानावरील काळे ठिपके या रोगांनी विविध भागात आक्रमण केल्याने शेतकऱ्यांना फवारणीचा जास्त खर्च करावा लागला सुरूवातीला पाना फुलावर पीक आले तेव्हा उत्तम स्थिती दिसत होती. मात्र बोंडाची भरणा झाली तेव्हा पहिल्या वेच्यामध्ये अवघ्या १५ ते १७ टक्केच बोंडाची फुटून झाल्याने शितादहीचा कापूस अत्यंत कमी उत्पादन झाला.आष्टी तालुक्यात थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, किन्ही, मोई, पोरगव्हाण, पंचाळा, पांढुर्णा या मौजातील कापूस अवघ्या दोनच वेचणीत उलंगवाडी झाला आहे. सरासरी प्रत्येक शेतकºयाला एकरी ३ ते ५ क्विंटल उत्पन्न झाले आहे. खासगी व्यापारी वर्गाने दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू केली तेव्हा भाव ५ हजार ९७१ प्रति क्विंटल दिला होता. नंतर कापसाचे ग्रेडेशन पाडून ६ हजार ६५० पर्यंत भाव दिला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील वसूल झाला नाही. शेताची नांगरणी, डवरणी, पेरणी, फवारणी, कपाशी वेचणी पर्यंतचा सरासरी एकरी खर्च २५ ते ३० हजाराच्या घरात आहे. निंदनासाठी सर्वाधिक खर्च करावा लागतो. अशावेळी निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकºयाला पार उध्वस्त केले आहे. त्यामुळे सोयाबीनमुळे बुडालेल्या शेतकरी कपाशीच्या उत्पादनाने आणखीनच चिंताग्रस्त झाला आहे.मागील वर्षी कापसाची वेचणी प्रती मन १५० ते २०० रुपये होती. यावर्षी १०० ते १२० रुपये प्रतिमन एवढा भाव आला आहे. किडीमुळे कापूस काहीसा चिकट आल्याने वेचणीला थोडा वेळ लागत आहे. याउलट ओलित भागातील कपाशीला चांगला काळ असल्याचे चित्र आहे. ओलित कपाशीचा कापूस एकरी १२ ते १५ क्विंटल कापूस होणार असल्याची माहिती आहे. शेतकरी मात्र भावामध्ये पुरता हादरला असल्याने पीक हाती येण्या आधीच ग्रहण लागल्याची स्थिती आहे.आष्टी तालुक्यात सध्या दोन जिनिंग सुरू झाले आहे. एम.आर.जिनिंग प्रेसिंगचे संचालक दिलीप राठी यांनी सांगितले की, यावर्षी कापूस कोरडवाहू शेतामध्ये पाहिजे तसा उत्पादन झाला नाही. कापूस आवक कमी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कापसाला ५ हजार ९०० पासून भाव दिला आहे.कापूस उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांसोबत, जिनिंग प्रेसिंगला बसला आहे. कापसाची आवक मंदावल्याने मजूरीचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण अर्थकारण संपुष्टात आले आहे.शासनाच्या हमीभावाची खरेदी कधी होणार?राज्य तथा केंद्र शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे वचनबद्ध केले. त्याची घोषणा केली. मात्र हमीभावाची खरेदी अद्याप सुरू झाली नसल्याने शासन नावाची यंत्रणा किती दक्षता पाळते. याचाही अनुभव चांगलाच झाला आहे. कापूस पणन महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्फत असणारे हमीभावाचे केंद्र म्हणजे बोलाच भात अन बोलालीच कढी असल्याच्या प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहे.खेडा पद्धतीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचं चांगभलंकापूस उत्पादन सुरू झाल्याबरोबर गावखेड्यातील लहान व्यापारी शेतकºयांकडे अक्षरश: तुटून पडले. ओळखीचा फायदा तर कुठे व्याजाने आणलेले पैसे परत मिळण्यासाठी ही गर्दी होती. त्यामुळे वजनाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या शेतकरी वर्गाला कापूस देणे बंधनकारक होते. काही ठिकाणी व्यापारी वर्गाने काटा करताना मोठी दांडी मारली. त्यानंतर कापूस गोळा केल्यावर मोठ्या ठिकाणी विकताना लहान व्यापाºयांनी पाणी मारून वजन वाढविले. यात स्वहित जोपासण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. एकूणच ग्रामीण भागात खेडा पद्धतीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.

टॅग्स :cottonकापूस