शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

कोरडवाहू कापूस उत्पादकांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:25 IST

यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे.

ठळक मुद्देओलिताखाली कापसाचे उत्पन्न दीडपट : लहान व्यापाऱ्यांचे ‘अच्छे दिन’, शासनाचे खरेदी केंद्र बंदच

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे. शासनाच्या हमीभावाची खरेदी अद्यापही सुरू झालीच नसल्याने शासकीय धोरणाचा फज्जा उडाल्याचे वास्तव्य आहे. आष्टी तालुकाच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात कुठेही हमीभावाची खरेदी सुरू झाली नाही.पावसाळा संपल्यावर सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने पीक उत्पादनावर परिणाम होण्याचे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. कपाशीवर दह्या, कवडी, मुळकुज, करपा, बोंडावरील काळे ठिपके, पानावरील काळे ठिपके या रोगांनी विविध भागात आक्रमण केल्याने शेतकऱ्यांना फवारणीचा जास्त खर्च करावा लागला सुरूवातीला पाना फुलावर पीक आले तेव्हा उत्तम स्थिती दिसत होती. मात्र बोंडाची भरणा झाली तेव्हा पहिल्या वेच्यामध्ये अवघ्या १५ ते १७ टक्केच बोंडाची फुटून झाल्याने शितादहीचा कापूस अत्यंत कमी उत्पादन झाला.आष्टी तालुक्यात थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, किन्ही, मोई, पोरगव्हाण, पंचाळा, पांढुर्णा या मौजातील कापूस अवघ्या दोनच वेचणीत उलंगवाडी झाला आहे. सरासरी प्रत्येक शेतकºयाला एकरी ३ ते ५ क्विंटल उत्पन्न झाले आहे. खासगी व्यापारी वर्गाने दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू केली तेव्हा भाव ५ हजार ९७१ प्रति क्विंटल दिला होता. नंतर कापसाचे ग्रेडेशन पाडून ६ हजार ६५० पर्यंत भाव दिला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील वसूल झाला नाही. शेताची नांगरणी, डवरणी, पेरणी, फवारणी, कपाशी वेचणी पर्यंतचा सरासरी एकरी खर्च २५ ते ३० हजाराच्या घरात आहे. निंदनासाठी सर्वाधिक खर्च करावा लागतो. अशावेळी निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकºयाला पार उध्वस्त केले आहे. त्यामुळे सोयाबीनमुळे बुडालेल्या शेतकरी कपाशीच्या उत्पादनाने आणखीनच चिंताग्रस्त झाला आहे.मागील वर्षी कापसाची वेचणी प्रती मन १५० ते २०० रुपये होती. यावर्षी १०० ते १२० रुपये प्रतिमन एवढा भाव आला आहे. किडीमुळे कापूस काहीसा चिकट आल्याने वेचणीला थोडा वेळ लागत आहे. याउलट ओलित भागातील कपाशीला चांगला काळ असल्याचे चित्र आहे. ओलित कपाशीचा कापूस एकरी १२ ते १५ क्विंटल कापूस होणार असल्याची माहिती आहे. शेतकरी मात्र भावामध्ये पुरता हादरला असल्याने पीक हाती येण्या आधीच ग्रहण लागल्याची स्थिती आहे.आष्टी तालुक्यात सध्या दोन जिनिंग सुरू झाले आहे. एम.आर.जिनिंग प्रेसिंगचे संचालक दिलीप राठी यांनी सांगितले की, यावर्षी कापूस कोरडवाहू शेतामध्ये पाहिजे तसा उत्पादन झाला नाही. कापूस आवक कमी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कापसाला ५ हजार ९०० पासून भाव दिला आहे.कापूस उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांसोबत, जिनिंग प्रेसिंगला बसला आहे. कापसाची आवक मंदावल्याने मजूरीचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण अर्थकारण संपुष्टात आले आहे.शासनाच्या हमीभावाची खरेदी कधी होणार?राज्य तथा केंद्र शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे वचनबद्ध केले. त्याची घोषणा केली. मात्र हमीभावाची खरेदी अद्याप सुरू झाली नसल्याने शासन नावाची यंत्रणा किती दक्षता पाळते. याचाही अनुभव चांगलाच झाला आहे. कापूस पणन महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्फत असणारे हमीभावाचे केंद्र म्हणजे बोलाच भात अन बोलालीच कढी असल्याच्या प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहे.खेडा पद्धतीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचं चांगभलंकापूस उत्पादन सुरू झाल्याबरोबर गावखेड्यातील लहान व्यापारी शेतकºयांकडे अक्षरश: तुटून पडले. ओळखीचा फायदा तर कुठे व्याजाने आणलेले पैसे परत मिळण्यासाठी ही गर्दी होती. त्यामुळे वजनाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या शेतकरी वर्गाला कापूस देणे बंधनकारक होते. काही ठिकाणी व्यापारी वर्गाने काटा करताना मोठी दांडी मारली. त्यानंतर कापूस गोळा केल्यावर मोठ्या ठिकाणी विकताना लहान व्यापाºयांनी पाणी मारून वजन वाढविले. यात स्वहित जोपासण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. एकूणच ग्रामीण भागात खेडा पद्धतीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.

टॅग्स :cottonकापूस