शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
3
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
4
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
5
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
6
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
7
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
8
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
9
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
10
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
11
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
12
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
13
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
14
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
15
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
16
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
17
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
18
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
19
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
20
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
Daily Top 2Weekly Top 5

उधारी द्यावी की, रब्बीची पेरणी करावी

By admin | Updated: December 11, 2014 23:12 IST

शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना चिंता : अधिवेशनाकडे लक्ष
वायगाव (नि.) : शासनाकडून शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव दिल्या जात नाही. निर्धारित वेळेवर भाववाढ न मिळाल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येत असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यातच रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणी करावी की उधारी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
केंद्रासह राज्यात सत्तापरिवर्तन झाले असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न कायम असल्याचे दुदैैवी चित्र आहे. शेतीवर संपूर्ण जिवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचा अवकृपा होत आहे. यामुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे, तर दुसरीकडे चांगला पगार असलेले संघटीत सरकारी कर्मचारी पगार वाढीसाठी आंदोलने करत असतात. मात्र जगाचा पोशिंदा आपला घाम गाळून पिकविलेल्या मालाला वाजवी भाव मिळावा याकरिता सरकारकडे आशेने बघत आहे. शासनाकडून काही मदत मिळाली तर त्याचा आधार होईल अशी अपेक्षा बळीराजाला आहे. खरीपाच्या हंगामात या वर्षी शेतकऱ्यांना नापिकीच्या सामना करावा लागला. यात सोयाबीन पूर्णत: गेले. कपाशीची आशा होती मात्र पाण्याअभावी वाढ खुंटली व पऱ्हाटीवर लाल्याने थैमान घातले. त्यातच कापसाला अत्यल्प भाव मिळत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आर्थिक दृष्ट्या हतबल झालेल्या शेतकरी रब्बीच्या पिकाकडे आशा लावून आहे. खरीपाच्या तोंडावर घेतलेली उधारीची चिंता मुलांचे शिक्षण, आजार, घरखर्च व आता रब्बीची सुरू झालेली पेरणी यामुळे चिंतेत अधिकच भर पडली. आहे.
कापसाला गत वर्षापेक्षाही राज्यशासनाने कमी हमीभाव दिल्याने शेतकऱ्यांची पूर्णत: निराशाच झाली आहे. हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असल्याने भावात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु रबी हंगाम सुरू झाला असतानाही हाती पैसा नसल्याने उधारी द्यावी की रबीची पेरणी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.(वार्ताहर)