शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर लाल्याचे तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण

By admin | Updated: November 2, 2016 00:41 IST

यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला.

शेतकरी संकटात : वेचणीच्या वेळेवर आलेल्या रोगामुळे उत्पादन घटण्याची शक्यतावर्धा : यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला. असे असले तरी पिकांच्या दृष्टीने योग्य पाऊस आला. सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका बसला; पण शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक हाती लागले. या पावसाचा फटका कपाशीला मात्र सहन करावा लागत असल्याचे दिसते. ओलसरपणा आणि थंडीची चाहुल यामुळे कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याचे दिसून येते. परिणामी, कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमणाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो. प्रारंभी दुबार-तिबार पेरणी केल्यानंतर काही प्रमाणात सोयाबीन हाती लागले. यातही उताऱ्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. कुणाला एकरी दहा ते बारा पोते तर काही शेतकऱ्यांना केवळ दोन ते तीन पोटे सोयाबीन झाल्याचे दिसे. या प्रकारामुळे शेतकरी हताश होते. हेच सोयाबीन दिवाळी सणाच्या कामी आले. सध्या कपाशीवर लाल्याने तर तुरीवर अळ्यांनी आक्रमण केले आहे. परिणामी, दोन्ही पिके संकटात सापडली आहेत़ कपाशी व तूर या पिकांतून काही प्रमाणात लावलेला खर्च निघेल, अशी अपेक्षा आहे; पण कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने कपाशी लाल पडून वाळू लागली आहे. तुरीवर अळ्यांचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असल्याने ते ही उत्पन्न संकटात सापडले आहे. थंडी पडल्यास तूर पीक वाचू शकते; पण अळ्यांच्या बंदोबस्ताकरिता शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे आहे. लाल्यामुळे कपाशीचे २५ टक्के उत्पन्न तरी घटणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. शिवाय भावही पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही. यामुळे खर्च भरून निघणार की नाही, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहेत. तुरीवर अळ्यांनी आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)