शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून कोटंबा, बाजारवाडा ठरलेय सुंदर ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती. 

ठळक मुद्देदोन्ही ग्रामपंचायतींना मिळाला प्रत्येकी २० लाखांचा पुरस्कार : जिल्हा परिषदेच्या सभागृहात रंगलाय वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावातील स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा, पर्यावरण, पादर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मार्ट गाव बनविणाऱ्या ग्रामपंचायतींना आर.आर.पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्काराने सन्मानित केले जाते. या स्पर्धेत तालुकास्तरावर बाजी मारुन जिल्हा स्तरावर पोहोचलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार दिला जातो. २०१९-२० चा जिल्हास्तरीय आर. आर. पाटील (आबा) सुंदर ग्राम पुरस्कार सेलू तालुक्यातील कोटंबा आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा ग्रामपंचायतीने पटकाविला असून दोन्ही ग्रामपंचायतीला २०-२० लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सभागृहात महात्मा गांधी स्वच्छग्राम स्पर्धा, आर. आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धा आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सरिता विजय गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती मृणाल माटे, सरस्वती मडावी, माधव चंदनखेडे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अविनाश गोहाड यांनी केले तर आभार सेलूचे सहायक गटविकास अधिकारी शालीग्राम पडघन यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते. 

तालुकास्तरीय सुंदर ग्रामला मिळाला दहा लाखांचा पुरस्कारआर.आर. पाटील सुंदर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीने भाग घेतला होता. यामध्ये तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना दहा लाखांचा पुरस्कार देण्यात आला. यात वर्धा तालुक्यातील महाकाळ, देवळीतील इंझाळा, समुद्रपुरातील पाठर, हिंगणघाटातील सावली (वाघ), आर्वीतील बाजारवाडा, सेलुतील कोटंबा, आष्टीतील नवीन आष्टी तर कारंजातील पांजरा (गोंडी) या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचा पुरस्कार आहे. याकरिता कोटंबा आणि बाजारवाडा या दोन्ही ग्रामपंचायती पात्र ठरल्यात.

जिल्हा स्वच्छ ग्राम स्पर्धेत रसुलाबाद ग्रामपंचायत प्रथमराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त यावर्षी महात्मा गांधी स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेकरिता प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामपंचायत निवडण्यात आली असून त्या ग्रामपंचायतीला एक लाखाचा पुरस्कार देण्यात आला. यात तालुकास्तरावर आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, आष्टीतील आनंदवाडी, देवळीतील कोळोणा (घोडे), हिंगणघाटमधील मुरपाड (मनोरा), कारंजातील पांजरा (गोंडी), सेलूतील धानोली (मेघे), समुद्रपुरातील पाठर आणि वर्धा तालुक्यातील महाकाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापैकी रसुलाबाद ग्रामपंचायत ही जिल्ह्यातून प्रथम, आनंदवाडी द्वितीय तर महाकाळ ग्रामपंचायत तृतीय स्थानी आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाखांचा पुरस्कार देण्यात आला.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत