शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे प्रेरणास्थान ठरलेल्या कस्तुरबा

By admin | Updated: February 22, 2017 00:48 IST

कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथी मातृदिन म्हणून साजरी केली जाते. गांधीजींशी बालवयात विवाह झाल्यानंतर सामाजिक कार्यात गांधीजींनी स्वत:ला वाहून घेतले.

स्मृतीदिन विशेष : भारत छोडोच्या नेतृत्वातून नवा आदर्श दिलीप चव्हाण  सेवाग्राम कस्तुरबा गांधी यांची पुण्यतिथी मातृदिन म्हणून साजरी केली जाते. गांधीजींशी बालवयात विवाह झाल्यानंतर सामाजिक कार्यात गांधीजींनी स्वत:ला वाहून घेतले. बापूंचेच नव्हे तर ‘बा’चे वैयक्तिक जीवन संपुष्टात येऊन आश्रमीय जीवन पद्धती अंगिकारली. यातून अनेक त्याग त्यांना करावा लागला; पण या त्यागातूनच त्यांचे जीवन राष्ट्रीय व स्वातंत्र्याच्या कामी आले. स्वातंत्र्य चळवळीत महिलांचे प्रेरणास्थान बनून आंदोलकांमध्ये स्फुलिंग निर्माणाचे काम त्यांनी केले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व करून जगापुढे नवा अहिंसक क्रांतीकारी आदर्श कस्तुरबा यांनी ठेवला. सेवाग्राम आश्रमात राहण्याचे भाग्य बा यांना केवळ सहा वर्षाचे लाभले; पण या आश्रमातील कार्यकर्त्यांना मातृव्रत प्रेम देऊन संस्कारासोबत घडविण्याचे कार्य बा यांनी केले. स्त्रीचे गुण व मूल्य जोपासणाऱ्या कस्तुरबा यांनी मात्र संयमाने विरतापूर्ण ब्रिटीश साम्राज्याशी लढा देण्याचे अलौकिक कार्य केले. अशा मातृहृदयी बा चे पुण्यातील आगाखाँ पॅलेसमध्ये २२ फेबु्रवारी १९४४ रोजी बंदिवासातच निधन झाले. त्यांची आज ७३ वी पुण्यतिथी आहे. कस्तुरबांचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षी झाला. त्या बापूपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. त्या अशिक्षित असल्या तरी संस्कारी होत्या. बापूंच्या पावलावर पाऊल टाकून त्या चालल्या. धार्मिक वृत्तीच्या कस्तुरबांना बापूंनी वाचायला व लिहायला शिकविले. एवढेच नव्हे तर आपल्या गुरूस्थळी पतीपासून कामापूरती इंग्रजी भाषाही शिकल्या. यावरून शिक्षण व शिकण्याची आवड व धडपड दिसून येते. १९०६ मध्ये बापूंनी ब्रह्मचारी व्रत स्वीकारले आणि कस्तुर या नावाच्या पाठीमागे ‘बा’ लागून कस्तुरबा, असे झाले. गांधीजी समवेत आश्रमच नव्हे तर देशवासियांच्या त्या कस्तुरबा झाल्या. १९३६ मध्ये मीरा बहननंतर बापू शेगाव मध्ये आले. खेड्यात ग्रामोत्थनाचे कार्य करण्यासाठी योग्य शेगाव दिसून आले. येथेच आश्रमाचा पाया रोवला गेला. बापू, बा व अन्य कार्यकर्ते आश्रमात राहून कार्य करू लागले. आश्रम नियम व तत्वावर चालत असल्याने बा वा बापूंना कामे करावी लागत. आश्रमची प्रार्थना, रसोडा, सूतकताई, वाचन, स्वच्छता, पाहुण्यांच्या आरोग्याची देखभाल बा करायच्या. स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचा मोठा सहभाग होता. शेकडो स्त्रियांनी तुरूंगवास सहन केला. बा व महिलांनी दारू दुकांनासमोर निदर्शन व सत्याग्रह केल्याचे नमूद आहे. आज अशा सत्याग्रहाची गरज आहे. दारूवर महिलाच बंदी आणू शकतात. मातृदिनी महिलांनी दारूबंदीचा संकल्प केल्यास बा यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल! आगा खा पॅलेसमध्येच समाधी बापूंनी १९८२ ला करा वा मराचा नारा दिला. मुंबईच्या सभेत उपस्थित राहण्यासाठी बा रवाना झाल्या. तत्पूर्वी आश्रमात बकुळीचे झाड लावून पर्यावरणाचा संदेश दिला. वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व सांगून गेल्या. ९ आॅगस्टला बा यांना अटक करून पुण्याच्या आगाखाँ पॅलेसमध्ये ठेवण्यात आले. बा ५ आॅगस्टला आश्रमातून गेल्या त्या परत न येण्यासाठीच! स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांशी लढा देणाऱ्या बा ना स्वतंत्र भारत पाहण्याचे भाग्य लाभले नाही. बंदीवासातच त्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले.