शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जंगलालाच कुंपण घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या हिताकरिता जंगलाला कुंपण घालण्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्या सरिता विजय गाखरे यांनी उपस्थित केला. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवित ठराव घेण्यात आला. हा ठराव आता शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत यांनी नालवाडी-मसाळा परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देवन्यप्राण्यांचा हैदोस : झेडपीच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी निसर्गकोपात होरपळत असतानाच वन्यप्राण्यांनी त्यांच्या संकटात आणखीच भर घातली आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसोबतच शेतकरी आणि जनावरांनाही जीव गमवावा लागत आहे. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाईही तोकडी असल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वन्यप्राण्यांपासून कायमची सुटका करण्याकरिता जंगलालच कुंपण घालावे, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला असून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि आचारसंहिता यामुळे कोरमअभावी तहकूब झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या बैठकीला उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, समाज कल्याण समिमी सभापती नीता गजाम, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखा अधिकारी शेळके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व सदस्य उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताकरिता जंगलाला कुंपण घालण्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्या सरिता विजय गाखरे यांनी उपस्थित केला. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवित ठराव घेण्यात आला. हा ठराव आता शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत यांनी नालवाडी-मसाळा परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याची मागणी केली. सभागृहामध्ये पंचायत विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग व समाज कल्याण विभागाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्वाधिक समस्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागीतील असल्याचे दिसून आले. मागील बैठक तहकूब झाल्याने या सभेती नवीन विषय न घेता मागील विषयांवरच चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व सदस्यही उपस्थित होते.सुधारित सर्वे करून लाभार्थींना लाभ द्यादलित वस्ती सुधार योजनेचे नाव सध्या अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास कार्यक्र म असे करण्यात आले आहे. पूर्वीच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या आराखड्यात बौद्धांची संख्या विचारात घेण्यात आली नाही. त्यामुळे नव्याने आराखडा तयार करण्याकरिता सुधारित सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ५ डिसेंबरपर्यंत सुधारित सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे.निवडणुकींमुळे तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली. या सभेमध्ये मागील सभेतील विषयांवरच चर्चा करण्यात आली. अजुनही बºयाच विषयावर चर्चा व निर्णय बाकी असल्याने पुन्हा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात येईल. अजून ६० दिवसाचा कार्यकाळ बाकी असून या कार्यकाळात सभा बोलावून या प्रश्नावर चर्चा केली जाईल.-नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती