शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

CoronaVirus: इतिहास गवाह है... कोरोनाच्या संकटात भारतीयांची भीती कमी करणारी बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 4:35 PM

भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देइंद्रजित खांडेकरांचा दावा रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जगाला कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने त्रस्त केले आहे. जगभरात या आजाराने २६ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला. भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.डॉ. खांडेकर यांनी कोरोना व इतर साथीच्या आजारावर अभ्यास करून काही निष्कर्ष पुढे आणले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतात २०१५ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली होती. त्यात जवळपास २ हजार मृत्यू झालेत. मात्र, २०१४, २०१५, २०१६ व २०१७ चा वार्षिक मृत्यू दर बघितला तर वार्षिक सरासरी मृत्यूमध्ये फरक नव्हता. २०१४ मध्ये मृत्यूदर प्रतिहजार लोकसंख्येमागे ७.२० होता. २०१५ मध्ये ७.१९ तर २०१६ मध्ये ७.२०, २०१७ मध्ये ७.२१ असा राहिला आहे. यावरून हे स्पष्ट होते, की ज्यावेळी साथ येते त्यावेळी साथीमुळे मृत्यू जरी वाढले तरीही मृत्यूदर वाढत नाही, उलट कमी झालेला दिसतो. भारतात जवळपास २४ ते २५ हजार मृत्यू दर दिवशी होतात. वार्षिक जवळपास ८७ लाख मृत्यू होतात. मागील साथीच्या मृत्यूचा अभ्यास केला तर हे निदर्शनास येईल की, यात कोरोनाच्या केसेस जरी त्यात समाविष्ट केल्या तरी हा आकडा (म्हणजे वार्षिक मृत्यूसंख्या) २०२० च्या अखेरीस पाहिला तर त्यात वाढ झालेली दिसणार नाही. उलट पाश्चिमात्य देशाशी तुलना केली तर भारतात साथरोगाच्या आजाराने मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. युनायटेड स्टेटमध्ये २००९ च्या स्वाईन फ्ल्यूच्या साथीमध्ये ६०.८ मिलियन लोक बाधित झाले होते. त्यापैकी १२ हजार ४६९ लोक एका वर्षात मृत्युमुखी पडले. भारतात ही साथ त्यावेळी आली होती. मात्र, मृत्यू १ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू कमी होण्याचे कारण भारतीयांची रोग प्रतिकारकशक्ती, वातावरण, तापमान आदी बाबी कारणीभूत आहेत. भारतात दररोज ४०८ मृत्यू व वार्षिक १.५ लाख मृत्यू केवळ रस्ते अपघातामुळे होतात. एक लॉकडाऊन ठेवला तर हमखास १.५ लाख लोकांचा जीव भारतात वाचविला जाऊ शकतो, असा दावा डॉ. खांडेकर यांनी केला आहे.

जगाच्या तुलनेत भारतात साथीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. भारतात २००९ मध्ये साथ आली होती. त्याचा अभ्यास केला तर आजही आलेल्या कोरोनाच्या आजारात भारतीय लोकांवर आरोग्यदृष्ट्या दूरगामी परिणाम होतील, असे म्हणता येणार नाही.. - डॉ. इंद्रजित खांडेकर,न्यायवैद्यक शाखाप्रमुख, महात्मा गांधी आर्युर्विज्ञान संस्था, सेवाग्राम. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या