शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

लिक कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By admin | Updated: November 14, 2016 00:58 IST

मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा अनेक ठिकाणी फुटला आहे. यामुळे अनेकांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे.

शेतकऱ्यांना फटका : कपाशी व अन्य पिके पिवळी पडल्याने नुकसानाची शक्यता
आकोली : मदन उन्नई धरणाचा डावा व उजवा कालवा अनेक ठिकाणी फुटला आहे. यामुळे अनेकांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी, कपाशीसह तुरीच्या पिकावर विपरित परिणाम होत आहे. कालव्याच्या लिकेजमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. याबाबत माहिती देऊनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
मदन उन्नई धरणाचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षी कारभाराचा सध्या या भागातील शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. या भागात धड मजबुत पाटचऱ्या नाही. त्या मातीने बुजल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी कालवा तुटला असून त्यात झुडपे वाढली आहेत. ज्या ठिकाणी कालव्याची दैनावस्था झाली आहे तेथे पाणी साचत असल्याने शेतजमीनीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मौजा वडगाव शिवारातील सुधाकर विठ्ठल बालपांडे यांच्या साडेचार एकरातील कपाशीचे पीक कालव्याच्या दैनावस्थेमुळे पिवळे पडले आहे. त्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पाहिजे त्या पेक्षा जास्त पाणी शेतात साचल्यामुळे कपाशीला बोंडे आली नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. उत्तम पाटील यांचे शेत सुद्धा पडीक झाले आहे. लिकेजचा फटका नुकतीच लागवड केलेल्या गहु व चना पिकाला बसल्याचे शेतकरी सांगतात. तक्रार करूनही संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.(वार्ताहर)

नुकसान भरपाईची मागणी
कालव्याच्या लिकेजमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच गहू आणि चना पिकाची लागवड केली. काही शेतातील पिके अंकुरली असतानाच कालव्याच्या पाण्यामुळे शेतात पाणी साचले आहे. परिणामी, अंकुरलेले पीक करपत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांच्या शेतातील चना व गहू पिकाचे बियाणे पाण्यामुळे जमिनीतच सडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. कालव्याच्या लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.