शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फलाटावर लाचखोरीतून बहरतोय अवैध व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.

ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष : लाखो रुपयांची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि सेवाग्राम या दोन्ही रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या अवैध वेंडरचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य निकृष्ट खाद्यपदार्थांमुळे धोक्यात आले आहे. या विषयीची माहिती लोकमतने जाणून घेतली असता महिन्याला १.७५ लाखांची आर्थिक उलाढाल या अवैध व्यवसायामागे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वर्धा व सेवाग्राम रेल्वे स्थानकावर लोकमत प्रतिनिधीने काही प्रवाशांना घेऊन फेरफटका मारल्यावर असे निदर्शनास आले की काही विशिष्ट व्यक्तींनाच खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मदत करीत आहे, अशी माहिती येथे कार्यरत व्यावसायिकांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकमतच्या प्रतिनिधीला दिली.शिवाय तशी चर्चाही कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. सेवाग्राम येथील फलाटावर दहा हातगाड्या आणि प्रत्येक हातगाडीवर केवळ दोनच व्यक्तींची नेमणूक करून खाद्यपदार्थ विक्री होणे क्रमप्राप्त आहे; पण एका हातगाडीवर पाच ते सहा व्यक्तींकडून खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे बघावयास मिळाले. तसेच प्रत्येक महिन्याला नचूकता लक्ष्मीदर्शनाचा लाभ घेऊन हे अवैध वेंडर पोसले जात असल्याने रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देण्याची तसेच विशेष पाऊल उचलण्याची गरज आहे.१.७५ लाखांच्या हिस्सेवाटपाची अशी आहे चर्चाजग्गा १५ हजार, जमिल २० हजार, कन्हैय्या १५ हजार, वीरू १० हजार, कल्लू १० हजार, चंद्रकांत १५ हजार, रंगारी १० हजार, तोला १५ हजार, सुनील १० हजार, जावेद ५ हजार, नासीर ५ हजार, समीर ५ हजार, मामा ५ हजार, नवीन १५ हजार आणि खान नामक व्यक्तीकडून २५ हजार रुपये प्रत्येक महिन्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांना नियमांना डावलून खाद्यपदार्थ आणि इतर साहित्याची विक्री करण्यासाठी दिल्या जात असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका कर्मचाºयाने सांगितले.अधिकारी बदलताच मनमर्जीने मालसुताई?वर्धा रेल्वे सुरक्षा बलात तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कांबळे यांनी आपल्या कामामुळे सदर अवैध व्यवसायांवर चांगलाच आटोक्यात आणले होते. परंतु, त्याची वर्धा येथून बदली होताच धावत्या रेल्वेसह रेल्वे फलाटावर नियम डावलून खाद्यपदार्थांसह इतर साहित्य विक्रीच्या प्रकाराला पुन्हा एकदा उधाण आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBribe Caseलाच प्रकरण