शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खासगीसह शासकीय कार्य गांधी विचारातून व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:00 AM

खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : विश्व-शांतीचा संदेश देणारी ‘जय जगत’ पदयात्रा वर्ध्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांनी ग्रामोद्योग व ग्रामविकास यावर विशेष लक्ष दिले. गांधीजींच्या स्वप्नातील भारत म्हणजे ग्राम होय; पण सध्या आपल्याला ग्रामोद्योग व ग्रामविकास घडवून आणायचा असेल तर खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.पी. वी. राजगोपाल यांच्या नेतृत्वात गांधी संदेश घेवून येथे आलेल्या ‘जय जगत’ विश्व शांती पदयात्रेचे स्वागत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या पदयात्रेच्या माध्यमातून बापूंच्या शांती, सद्भावना व बंधुभाव हे सूत्र संपूर्ण जगात पोहोचविले जात आहे. राजघाट दिल्ली ते सेवाग्राम पदयात्रेचा एक टप्पा म्हणून ही पदयात्रा वर्धेतील अग्निहोत्री कॉलेज परिसरात शनिवारी सायंकाळी उशीरा पोहचली. तेथे रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी येऊन पी. वी. राजगोपाल यांच्यासह सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले. याप्रसंगी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. गांधी सिद्धांतामध्ये विचार, आचार व प्रचार हे मुळ आहे. विचारासोबत आचरण असले पाहिजे आणि या आचरणातून आपण प्रचार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी १५ आंतरराष्ट्रीय पदचारींसह सुमारे १०० सत्याग्रही व जय महाकाली शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद गिरडकर, अरुण वसू, दत्तात्रय कानस्कर आदी उपस्थित होते.यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण - पी. वी. राजगोपालजय जगत पदयात्रेचा बापूंच्या भूमीत २००० कि.मी. अंतराचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. या यात्रेदरम्यान विविध विषयांवर ठिकठिकाणी चर्चा झाली. येत्या गांधी पुण्यतिथीपर्यंत नॉन व्हायलेंट एकॉनोमी व नॉन व्हायलेंट गर्व्हनन्स या दोन मुद्द्यांवर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा व सेवाग्राम आश्रम येथे विविध तज्ञांसोबत चर्चा होणार असल्याचे याप्रसंगी पी. वी. राजगोपाल यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक