शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कापूस व सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या

By admin | Updated: November 8, 2014 22:42 IST

विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस

रामदास तडस यांचे केंद्र व राज्य सरकारला साकडेवर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पेरेरचनेनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्यावे व त्यामध्ये शेतीची मर्यादा किमान चार हेक्टर ठेवावी. शेतकऱ्यांना २० टक्के अग्रीम बोनस देवून केंद्र सरकारच्या हमीभावामध्ये वाढ करावी, अशी कळकळीची मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.यासोबतच शेतकऱ्यांचे थकीत असलेल्या कर्जाचे दहा टप्पे पाडावे व ते बिनव्याजी असावे आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वेगळा विचार करून त्यांची शेती सिंचनाखाली आणण्याकरिता प्रयत्न करण्यात यावे, त्याकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. शेतीची आणेवारी काढताना ५० पैशाच्या आत असावी, कारण सोयाबीनचे एकरी उत्पन्न १ क्विंटल असून कापसाचे एकरी उत्पन्न ५० किलोच्या घरात आहे. गाव पातळीवर पेरे आढावा घेवून आणेवारी घ्यावी. पावसावर आधारीत पीक विमा योजना असल्याने ग्रामपंचायतीमध्ये पाऊस मोजण्याचे यंत्र असावे, क्रॉप इन्शुरन्स गाव स्तरावर लागू करावी, अशी मागणीही तडस यांनी केली आहे.ऊस उत्पादकांना ज्या प्रकारे खतासाठी सबसिडी मिळते त्याप्रमाणे कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांनाही सबसिडी देण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. या सर्व बाबीकडे शासनाने लक्ष पुरविल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. विदर्भातील पूर्ण खासदार व आमदारांनी सुद्धा या मागण्या लावून धरल्यास सरकारकडून निश्चितच विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.(जिल्हा प्रतिनिधी)