शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

पन्नाशी गाठलेले पोलीसदादा करणार कार्यालयीन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने देशभरता थैमान घातले आहे. नेमणुकीस असलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये विशेषत: ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती : पोलीस अधीक्षकांचे सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारीदेखील कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या २८ एप्रिलच्या पत्रान्वये पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्हा पोलीस दलातील पन्नाशी ओलांडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केवळ कार्यालयीन कर्तव्य नेमूण देण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील ५०-५५ वयोगटातील सुमारे सुमारे ८० पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने देशभरता थैमान घातले आहे. नेमणुकीस असलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये विशेषत: ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा वयोगटातील पोलिसांना आता कार्यालयीन किंवा जनतेशी संपर्क येणार नाही अशा ठिकाणी डयूटी देण्यात यावी, त्यांना सॅनिटायझर, मास्क व इतर साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी सर्व कार्यालयप्रमुखांना दिले आहेत. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल ८० च्या जवळपास कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे ५० वर्षे वय असलेल्यांना कार्यालयीन कामकाज करण्याचे आणि ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आली आहे.आवश्यक असल्यास मिळणार रजावयाची पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्त वाहिन्यांसंदर्भात समस्यांचे प्रमाण अधिक असते. त्यातच कामाचा ताणतणाव, वरिष्ठांचा दबाव व घरापासून कोसो दूर राहावे लागत असल्याने पोलिसांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त आजाराने ग्रस्त असलेल्या पोलिसांनी सुटी मागितल्यास त्यांची रजा तत्काळ मंजूर करण्यात येत आहे.वेतन कपातीचाही फटकाकोरोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरून दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाºयांना वेतन कपातीचाही फटका सहन करावा लागातो आहे. जीवाची पर्वा न न करता पोलीस कर्मचारी जोखीम पत्कारून, कुटुुुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य निभवत आहे. पण, त्यांची ३० टक्के वेतन कपात केल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.१३ पोलीस कर्मचारी सक्तीच्या रजेवरशहर पोलीस ठाण्यातील ५५ वर्षे वयोगटावरील तब्बल १३ कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तर ५० वर्षे वयोगटातील पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. सावंगी ठाण्यातील एक कर्मचारी रजेवर पाठविणार तर एका कर्मचाऱ्यास कार्यालयीन कामकाज देणार आहे. रामनगर पोलीस ठाण्यातील ५० वर्षे वयोगटात येणाऱ्या १५ पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्यातील एक कर्मचाºयाला रजेवर पाठविण्यात आले आहे तीघांना कार्यालयीन कामकाज देण्यात आल्याची माहिती शहर, रामनगर, सावंगी आणि सेवाग्राम येथील ठाणेदारांनी दिली.जरा आमच्याही वेदना समजून घ्याकोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मागील ४७ दिवसांपासून पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून लढा देत आहेत. कुणी आपले मुलबाळ, वृद्ध आई-वडिल, आजारी पत्नी तर काही आपल्या कुटुंबांपासून कोसो दूर आहे. स्थानिक पोलीस कर्मचारी घरी गेले तर त्यांना आपल्या मुलाबाळांच्या जवळ जाता येत नाही, एकांतात राहून एका खोलीत स्वत:ला बंद करावे लागते, त्यामुळे आमच्या व्यथा कोण जाणत आहे, आम्ही नागरिकांची सुरक्षा करतो पण, आज आमचीच सुरक्षा धोक्यात आली असल्याचे अनेक पोलीस कर्मचारी सांगत होते.ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आहे अशा ५५ वर्षे वयोगटाखालील सर्व पोलीस कर्मचाºयांना रजेवर पाठविण्यात आले आहे. तर ५० वर्षे वयोगटातील पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षकाखालील दर्जावर असलेल्या जल्ह्यातील सुमारे ८० च्या जवळपास पोलिसांना कार्यालयीन कामकाज तसेच काहींना रजेवर पाठविण्यात आले आहे.- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस