शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

शाळा बंद तरी पालकांच्या मोबाईलवर ‘फी’चे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 7:58 PM

शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देसंकट : लॉकडाऊनमुळे त्रस्त पालकांच्या अडचणींमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे शासनाने ठरवले असले तरी कोरोनाबाधितांमुळे व्यापलेले स्थानिक क्षेत्र पाहता ते वेळापत्रक याठिकाणी पाळले जाईल, याची खात्री जिल्हा प्रशासनालाही देता येत नाही. असे असले तरी शाळांनी मात्र आपले धूमशान सुरू केले असून, फी वसुलीसाठी पालकांना मोबाईलवर संदेश पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. शाळांच्या या भूमिकेमुळे पालकांच्या अडचणीत वाढ झाली असून फी च्या रकमेसाठी तगादा का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून सर्व प्रकारचे दळणवळण थांबले आहे. त्यामुळे पालकांजवळ पुरेसा पैसा नाही. कुटुंबाचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांना आधीच मोठी कसरत करावी लागत आहे.त्यातच शाळांनी फी बाबतचे संदेश पाठवणे सुरू केल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहे.काही शाळांनी दिलेल्या संदेशानुसार पालकांनी तातडीने शाळांशी संपर्क करून फी भरावी व आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे म्हटले आहे. नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका पालकाने सांगितले, की शाळांनी सुरू केलेला हा तगादा पालकांना अजिबात आवडलेला नाही.कोरोनाचे संकट जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत शाळा तरी कशी सुरू होणार, असा प्रश्न पालक करीत आहे. शिवाय यावर्षीचे एकूणच सत्र हे कमी कालावधीचे राहणार असल्याने शाळांनी पूर्ण फी का मागावी, असाही सूर पालकांकडून उमटत आहे.या आहेत पालकांच्या मागण्याशुल्क वसुलीबाबत शाळांनी तगादा लावू नये.शुल्क भरण्यासाठी टप्पे (किस्त) पाडून द्यावे.जेवढ्या कालावधीसाठी प्रत्यक्ष ज्ञानदान होणार आहे, त्याच कालावधीची फी आकारली जावी.कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फी मागितली जाऊ नये.

टॅग्स :Schoolशाळा