शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:37 PM

शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो.

ठळक मुद्देसुधीर कोठारी : कृउबासतील शुभारंभ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो. बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यास भावही योग्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सन १९९२ पासून बाजार समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात आयोजित शेतमाल तारण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक उत्तम भोयर, ओमप्रकाश डालीया, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, अशोक उपासे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शेतकरी रितेश तळवेकर रा. सिंदी (रेल्वे) यांचा सत्कार करण्यात आला.कृउबासचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे, पण माल विकायचा नाही तसेच माल साठवणुकीसाठी घरी जागेचा अभाव आहे, अशा शेतकºयांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक करावा. साठवणुकीच्या दिवशी सदर मालाचे बाजारातील दर लक्षात घेता वखार पावतीवर ७० टक्केपर्यंत बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते. वखार पावतीवर बाजार समितीमार्फत दिलेले तारण कर्ज शेतकऱ्यांनी सहा महिन्याचे आत समितीला जमा केल्यास वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत संबंधित शेतकºयाला परत करण्यात येते. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेल्या मालाची शेतकरी स्वत: विक्री करू शकतो. तर बाजार समिती हिंगणघाट येथील गोदामात केवळ सोयाबीन या शेतमालाची साठवणूक करण्यात येत आहे. त्यावर ७० टक्के तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात शेतकºयाला गोदाम भाडे, हमालीचा खर्च लागत नाही. तो बाजार समिती करते. शिवाय शेतमालाची विक्रीही बाजार समितीमार्फत केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अशोक उपासे, विनोद वानखेडे, सुरेश सातोकर, बळीराम नासर, संजय तपासे, राजेश मंगेकर, सुरेश वैद्य, बापुराव महाजन, शेषकुमार येरलेकर, पंकज कोचर, राजेश कोचर, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे, संजय कातरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव टी. सी. चांभारे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी शेतकºयांना सदर योजनेची सोप्या शब्दात माहिती दिली.