शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने साडेतीन एकरातील सोयाबीनवर चालविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला.

ठळक मुद्देसोयाबीन कुजले, कपाशीला बोंडच नाही : कारंजा तालुक्यातील गवंडी येथील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. त्यात परतीच्या पावसानेही चांगला दणका दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन शेतातच कुजले. कपाशीचीही जोमाने वाढ झाली पण; बोंड नगण्यच. त्यामुळे नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र २८ जुलै रोजी तालुक्यात १०३ पावसाची नोंद असतानाही कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झालीच नसल्याचा कांगावा करीत तालुका प्रशासनानेही दुर्लक्ष केले. परिणामी, हतबल झालेल्या गवंडी येथील एका शेतकºयाने साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. तर दुसऱ्या शेतकऱ्याने कपाशीच उपटून टाकल्याच वास्तव पुढे आलं आहे.कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला. डोेळ्यादेखत मेहनतीने फुलविल्या पिकावर रोटाव्हेटर चालविताना पापण्याआड पाणी तरळत होते. हीच परिस्थिती कपाशीचीही झाली आहे. कपाशी दुरुन उंच आणि हिरवीगार दिसत असली तरी आत गेल्यानंतर मोजकेच बोंड दिसत असल्याने कपाशीच्या उत्पादनाचाही भरवसा राहिला नाही. म्हणून काही शेतकऱ्यांनी आता पऱ्हाटी उपटण्याचाही निर्णय घेतला आहे. तालुक्यात अतिवृष्टी असतानाही प्रशासनाने पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी देविदास घागरे, घनश्याम बारंगे व पिंटू डोबे आदी शेतकºयांनी केली आहे.जिल्ह्याला मिळाले ४० लाखऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जमिन महसुलात सूट, शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी आदी विविध सवलती देण्याच्या उद्देशाने शासनाकडून वर्धा जिल्ह्याला ४० लाख २५ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. विशेषत: प्रत्यक्षात नुकसान जास्त असल्याची वास्तव परिस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी