शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

'प्रकल्प प्रेरणा'नंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:43 IST

आठ महिन्यात ४८ आत्महत्या : ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रकल्प प्रेरणा सुरू केला. या अंतर्गत जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू आहे. असे असले तरी गत आठ महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने प्रकल्प कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात वर्ष २००१ ते २०२४ या कालावधीत २ हजार ४४२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यात अंतिम अहवालात केवळ १ हजार २२२ शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांचा वाढत्या आत्महत्या लक्षात घेत वर्ष नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रकल्प प्रेरणा सुरू केला. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गृहभेटीतून त्याच्या समस्या जाणून घेत आत्महत्येचे विचार मनात डोकावण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला. यात नैराश्यग्रस्त, असलेले नैराश्यात व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले, मानसिक आजाराने ग्रस्त व अन्य आजाराने पीडित अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात जुलै २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ३४ हजार ३३५ शेतकऱ्यांवर समुपदेशन केले जात आहे. तर ८९२ शेतकऱ्यावर समुपदेशनासह औषधोपचार करण्यात येत आहे. 

महिन्याकाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात २ हजार ७०० ते तीन हजार जनांना समुपदेशन केले जाते. शिवाय गृहभेटीच्या माध्यमातून समुपदेशनासह औषधोपचार केले जात असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. समुपदेशनात जिल्हा देशात सातव्या स्थानी तर राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही सांगण्यात आले. समुपदेशन प्रकल्पाला सुरूवात केल्यानंतर शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

आत्महत्येमागची प्रमुख कारण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी नसलेले धोरण. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळणारे बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढाताण, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. 

अर्धा जिल्हा अति जोखमीचा आठ तालुक्याचा वर्धा जिल्हा, त्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असलेल्या शेतकऱ्यांत जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. यात आर्वी, आष्टी, हिंगणघाट, आणि कारंजाचा समावेश आहे.

५८ जणांचे केले डेथ ऑडिटसमुपदेशन, औषधोपचार सुरु असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आले आहे. जुलै २०२३ ते जुले २०२४ पर्यंत ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्यांचे जिल्हा सामान्य रुग्णाल- याकडून डेथ ऑडिट करण्यात आले आहे. यात मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

"समुपदेशन व औषधोपचारासाठी टीम नेमण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस गृहभेटी देण्यात येते. यात एक दिवस समुपदेशन तसेच एक दिवस औषधोपचार करण्यात येतो." - डॉ. सुदर्शन हरले, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा.

शेतकरी आत्महत्येचा ओसरता आलेखवर्ष २०१३ पासून शेतकरी आत्महत्या पाहिल्या तर पात्र ठरलेल्यांमध्ये २०१३ मध्ये ७७, वर्ष २०१४ मध्ये ११०, वर्ष २०१५ मध्ये १३९, वर्ष २०१६ मध्ये ९३ आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या. मात्र त्यानंतर शेतकरी आत्महत्येत घसरण झाली. वर्ष २०१७ मध्ये ७६, वर्ष २०१८ मध्ये ७१ वर्ष २०१९ मध्ये ६३, वर्ष २०२० मध्ये ५३, वर्ष २०२१ मध्ये ५६, वर्श २०२२ मध्ये ७७, वर्श २०२३ मध्ये ४३ तर वर्ष २०२४ मध्ये हा आकडा ४८ वर आला आहे. प्रकल्पामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwardha-acवर्धाfarmingशेती