शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'प्रकल्प प्रेरणा'नंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:43 IST

आठ महिन्यात ४८ आत्महत्या : ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रकल्प प्रेरणा सुरू केला. या अंतर्गत जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू आहे. असे असले तरी गत आठ महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने प्रकल्प कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात वर्ष २००१ ते २०२४ या कालावधीत २ हजार ४४२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यात अंतिम अहवालात केवळ १ हजार २२२ शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांचा वाढत्या आत्महत्या लक्षात घेत वर्ष नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रकल्प प्रेरणा सुरू केला. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गृहभेटीतून त्याच्या समस्या जाणून घेत आत्महत्येचे विचार मनात डोकावण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला. यात नैराश्यग्रस्त, असलेले नैराश्यात व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले, मानसिक आजाराने ग्रस्त व अन्य आजाराने पीडित अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात जुलै २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ३४ हजार ३३५ शेतकऱ्यांवर समुपदेशन केले जात आहे. तर ८९२ शेतकऱ्यावर समुपदेशनासह औषधोपचार करण्यात येत आहे. 

महिन्याकाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात २ हजार ७०० ते तीन हजार जनांना समुपदेशन केले जाते. शिवाय गृहभेटीच्या माध्यमातून समुपदेशनासह औषधोपचार केले जात असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. समुपदेशनात जिल्हा देशात सातव्या स्थानी तर राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही सांगण्यात आले. समुपदेशन प्रकल्पाला सुरूवात केल्यानंतर शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

आत्महत्येमागची प्रमुख कारण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी नसलेले धोरण. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळणारे बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढाताण, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. 

अर्धा जिल्हा अति जोखमीचा आठ तालुक्याचा वर्धा जिल्हा, त्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असलेल्या शेतकऱ्यांत जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. यात आर्वी, आष्टी, हिंगणघाट, आणि कारंजाचा समावेश आहे.

५८ जणांचे केले डेथ ऑडिटसमुपदेशन, औषधोपचार सुरु असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आले आहे. जुलै २०२३ ते जुले २०२४ पर्यंत ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्यांचे जिल्हा सामान्य रुग्णाल- याकडून डेथ ऑडिट करण्यात आले आहे. यात मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

"समुपदेशन व औषधोपचारासाठी टीम नेमण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस गृहभेटी देण्यात येते. यात एक दिवस समुपदेशन तसेच एक दिवस औषधोपचार करण्यात येतो." - डॉ. सुदर्शन हरले, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा.

शेतकरी आत्महत्येचा ओसरता आलेखवर्ष २०१३ पासून शेतकरी आत्महत्या पाहिल्या तर पात्र ठरलेल्यांमध्ये २०१३ मध्ये ७७, वर्ष २०१४ मध्ये ११०, वर्ष २०१५ मध्ये १३९, वर्ष २०१६ मध्ये ९३ आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या. मात्र त्यानंतर शेतकरी आत्महत्येत घसरण झाली. वर्ष २०१७ मध्ये ७६, वर्ष २०१८ मध्ये ७१ वर्ष २०१९ मध्ये ६३, वर्ष २०२० मध्ये ५३, वर्ष २०२१ मध्ये ५६, वर्श २०२२ मध्ये ७७, वर्श २०२३ मध्ये ४३ तर वर्ष २०२४ मध्ये हा आकडा ४८ वर आला आहे. प्रकल्पामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwardha-acवर्धाfarmingशेती