शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

'प्रकल्प प्रेरणा'नंतरही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:43 IST

आठ महिन्यात ४८ आत्महत्या : ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रकल्प प्रेरणा सुरू केला. या अंतर्गत जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांवर समुपदेशन सुरू आहे. असे असले तरी गत आठ महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने प्रकल्प कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात वर्ष २००१ ते २०२४ या कालावधीत २ हजार ४४२ जणांनी आत्महत्या केल्या. त्यात अंतिम अहवालात केवळ १ हजार २२२ शेतकरी पात्र ठरले. शेतकऱ्यांचा वाढत्या आत्महत्या लक्षात घेत वर्ष नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रकल्प प्रेरणा सुरू केला. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. शेतकऱ्यांच्या गृहभेटीतून त्याच्या समस्या जाणून घेत आत्महत्येचे विचार मनात डोकावण्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला. यात नैराश्यग्रस्त, असलेले नैराश्यात व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले, मानसिक आजाराने ग्रस्त व अन्य आजाराने पीडित अशा शेतकऱ्यांचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात जुलै २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत ३४ हजार ३३५ शेतकऱ्यांवर समुपदेशन केले जात आहे. तर ८९२ शेतकऱ्यावर समुपदेशनासह औषधोपचार करण्यात येत आहे. 

महिन्याकाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात २ हजार ७०० ते तीन हजार जनांना समुपदेशन केले जाते. शिवाय गृहभेटीच्या माध्यमातून समुपदेशनासह औषधोपचार केले जात असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. समुपदेशनात जिल्हा देशात सातव्या स्थानी तर राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचेही सांगण्यात आले. समुपदेशन प्रकल्पाला सुरूवात केल्यानंतर शेतकरी आत्महत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

आत्महत्येमागची प्रमुख कारण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी नसलेले धोरण. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळणारे बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढाताण, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. 

अर्धा जिल्हा अति जोखमीचा आठ तालुक्याचा वर्धा जिल्हा, त्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत असलेल्या शेतकऱ्यांत जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. यात आर्वी, आष्टी, हिंगणघाट, आणि कारंजाचा समावेश आहे.

५८ जणांचे केले डेथ ऑडिटसमुपदेशन, औषधोपचार सुरु असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आले आहे. जुलै २०२३ ते जुले २०२४ पर्यंत ५८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्यांचे जिल्हा सामान्य रुग्णाल- याकडून डेथ ऑडिट करण्यात आले आहे. यात मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

"समुपदेशन व औषधोपचारासाठी टीम नेमण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस गृहभेटी देण्यात येते. यात एक दिवस समुपदेशन तसेच एक दिवस औषधोपचार करण्यात येतो." - डॉ. सुदर्शन हरले, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा.

शेतकरी आत्महत्येचा ओसरता आलेखवर्ष २०१३ पासून शेतकरी आत्महत्या पाहिल्या तर पात्र ठरलेल्यांमध्ये २०१३ मध्ये ७७, वर्ष २०१४ मध्ये ११०, वर्ष २०१५ मध्ये १३९, वर्ष २०१६ मध्ये ९३ आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या. मात्र त्यानंतर शेतकरी आत्महत्येत घसरण झाली. वर्ष २०१७ मध्ये ७६, वर्ष २०१८ मध्ये ७१ वर्ष २०१९ मध्ये ६३, वर्ष २०२० मध्ये ५३, वर्ष २०२१ मध्ये ५६, वर्श २०२२ मध्ये ७७, वर्श २०२३ मध्ये ४३ तर वर्ष २०२४ मध्ये हा आकडा ४८ वर आला आहे. प्रकल्पामुळे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwardha-acवर्धाfarmingशेती