शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देमतदार नोंदणी कार्यक्रम । त्रुटी दूर न केल्यास नोंदणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या सर्वसाधारण मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार ८६२ नागरिकांनी तालुकाकचेरीतील निवडणूक विभागाकडे नाव नोंदविणे, नाव कमी करणे, नावात दुरूती करणे, पत्ता किंवा यादी भाग क्रमांक बदलविण्यासाठी रितसर अर्ज केले आहेत. सदर अर्जांची छानणी युद्धपातळीवर सुरू असून ७५७ अर्जामध्ये विविध त्रुट्या आढळून आल्याने अर्जदारांना एसएमएस करण्यात आले आहेत. सदर त्रुटींची पूर्तता वेळीच न केल्यास अर्जदाराला मतदानापासूनच वंचित राहवे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या नव्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार १२ एप्रिल २०२० पर्यंत नागरिकांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून २० फेबु्रवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी १ हजार ८४०, नाव कमी करण्यासाठी ४ हजार ४९२, नावात दुरूस्तीसाठी ३ हजार ९६७ तर पत्ता किंवा यादी भाग बदलासाठी ५६३ व्यक्तींनी आॅफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. या अर्जाची छानणी सध्या युद्धपातळीवर होत असून ७५७ अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. ज्या व्यक्तीच्या अर्जात त्रुटी आढळली त्या व्यक्तीस त्रुटीबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.५७२ व्यक्तींनी सादर केली नाही ‘रेफरन्स कॉपी’मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अनेक व्यक्ती करतात. पण ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने रेफरन्स कॉपी तालुक्याच्या निवडणूक कार्यालयात वेळीच सादर करणे क्रमप्राप्त आहेत. पण ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अर्ज करणाऱ्या ५९२ व्यक्तींपैकी सुमारे ५७२ अर्जदारांनी रेफरन्स कॉपीच वर्धा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर केलेले नाहीत. रेफरन्स कॉपी न सादर करणाऱ्यांची त्रुट्यांअभावी नोंदणीच होणार नसल्याचे सांगण्यात आले.मतदान केंद्रांवर होताहेत याद्या प्रसिद्धतालुका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून अर्ज नमुना सात प्राप्तचे नमुना १० मधील २८ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर नमुना आठ प्राप्तचे नमुना ११ मधील ७१ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहे.नव मतदारांची नोंदणी व्हावी. शिवाय अचूक मतदार यादी तयार व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेवरून मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. ज्या अर्जात त्रुट्या आढळल्या त्या अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यांनी त्रुट्यांची वेळीच पूर्तता करणे क्रमप्राप्त आहे.- भगवान वनकर, नायब तहसीलदार, निवडणूक वर्धा.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान