शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:00 AM

विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देमतदार नोंदणी कार्यक्रम । त्रुटी दूर न केल्यास नोंदणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या सर्वसाधारण मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार ८६२ नागरिकांनी तालुकाकचेरीतील निवडणूक विभागाकडे नाव नोंदविणे, नाव कमी करणे, नावात दुरूती करणे, पत्ता किंवा यादी भाग क्रमांक बदलविण्यासाठी रितसर अर्ज केले आहेत. सदर अर्जांची छानणी युद्धपातळीवर सुरू असून ७५७ अर्जामध्ये विविध त्रुट्या आढळून आल्याने अर्जदारांना एसएमएस करण्यात आले आहेत. सदर त्रुटींची पूर्तता वेळीच न केल्यास अर्जदाराला मतदानापासूनच वंचित राहवे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या नव्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार १२ एप्रिल २०२० पर्यंत नागरिकांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून २० फेबु्रवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी १ हजार ८४०, नाव कमी करण्यासाठी ४ हजार ४९२, नावात दुरूस्तीसाठी ३ हजार ९६७ तर पत्ता किंवा यादी भाग बदलासाठी ५६३ व्यक्तींनी आॅफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. या अर्जाची छानणी सध्या युद्धपातळीवर होत असून ७५७ अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. ज्या व्यक्तीच्या अर्जात त्रुटी आढळली त्या व्यक्तीस त्रुटीबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.५७२ व्यक्तींनी सादर केली नाही ‘रेफरन्स कॉपी’मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अनेक व्यक्ती करतात. पण ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने रेफरन्स कॉपी तालुक्याच्या निवडणूक कार्यालयात वेळीच सादर करणे क्रमप्राप्त आहेत. पण ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अर्ज करणाऱ्या ५९२ व्यक्तींपैकी सुमारे ५७२ अर्जदारांनी रेफरन्स कॉपीच वर्धा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर केलेले नाहीत. रेफरन्स कॉपी न सादर करणाऱ्यांची त्रुट्यांअभावी नोंदणीच होणार नसल्याचे सांगण्यात आले.मतदान केंद्रांवर होताहेत याद्या प्रसिद्धतालुका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून अर्ज नमुना सात प्राप्तचे नमुना १० मधील २८ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर नमुना आठ प्राप्तचे नमुना ११ मधील ७१ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहे.नव मतदारांची नोंदणी व्हावी. शिवाय अचूक मतदार यादी तयार व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेवरून मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. ज्या अर्जात त्रुट्या आढळल्या त्या अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यांनी त्रुट्यांची वेळीच पूर्तता करणे क्रमप्राप्त आहे.- भगवान वनकर, नायब तहसीलदार, निवडणूक वर्धा.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान