शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 15:24 IST

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.

ठळक मुद्देखरबुजाच्या पिकाने जीवनातही आला गोडवाशेतीतील प्रयोग इतरांसाठी ठरतेय प्रेरणादायी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शेतकरी पित्याने दोन्ही मुलांना चांगले संस्कार देत शिक्षणासाठी शेतात रक्त आटवले. मुलांना उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता कर्ज काढून वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पित्याची ही धडपड पाहून मुलांनीही अभियांत्रिकेची पदवी मिळविली. त्यानंतर नोकरीकरिता प्रयत्न केले पण, नोकरी मिळाली नाही. दोन्ही भावंडांना वडिलांवरील कजार्ची नेहमीच चिंता असायची. म्हणून बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.रजत पुरुषोत्तम उईके व शुभम पुरुषोत्तम उईके, असे या कर्तबगार भावंडाचे नाव आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तम धोंडुजी उईके हे हिंगणघाट तालुक्याच्या जांगोना या गावातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे दहा एकर शेती असून त्यातील पाच एकरामध्ये ओलीताची सोय आहे. या दहा एकराच्या भरोवशावरच पुरुषोत्तम उईके यांनी पाच सदस्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी रजत आणि शुभमला शिकविले. त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड न पडू देता वेळोवेळी कजार्ची उचल करुन दोघांना अभियंता बनविले. थोरला रजत हा सिव्हिल इंजिनिअर तर धाकटा शुभम हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला. आता नोकरीकरुन वडिलांना आधार देण्यासाठी इतर युवकांप्रमाणेच यांनीही मोठ्या शहराकडे धाव घेतली. पण, बेरोजगारीच्या या वावटळीत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी तडख आपले गाव गाठून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात आल्यानंतर घरच्यांना हा निर्णय सांगून दुसºया दिवशीपासून शेतात राबायला सुरुवात केली. जे पीक गावातील इतर शेतकरी घेत नाही व आतापर्यंत घेतलेले नाही ते पीक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. अडीच एकरात खरबुजाची लागवड करीत त्यातून आता एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. या भावंडांच्या या प्रयत्नाला यश आल्याने जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे.शेतातील झोपडीत ठोकला मुक्कामरजत आणि शुभम या मुलांची शेतीत साथ मिळाल्याने वडिलांनाही मोठा आधार मिळाला आहे. त्यांनी खरबुजाची लागवड केल्यापासूनच शेतातच झोपडी टाकून तेथे मुक्काम सुरु केला आहे. आता जैविक खरबुजाचे पिक चांगलेच बहरल्याने या भावंडाची मेहनत फळाला आली आहे. अडीच एकारातून एक दिवसाआड दीड टन खरबूज निघत असून ते बाजारभावानुसार सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे विकले जात आहे. खर्चवजा जाता त्यांना ३५ हजार रुपये मिळत आहे. या पिकातून त्यांना २० ते २२ टन उत्पादनाचा अंदाज असून यातून खर्चवजा जात ५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.लॉकडाऊनमध्ये होम डिलेव्हरीकोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भाजीपाला व फळे विकण्यारिता उत्पादकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रजत व शुभमलाही खरबूज विकण्यासाठी अडचणी जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करीत कल्पकतेच्या सहाय्याने ह्यहोम डिलेव्हरीह्ण हा पर्याय शोधून काढला. खरबुजाची व्यवस्थित पॅकींग करुन ते घरोघरी पोहोचविले जात आहे. यासोबतच त्यांनी वध्यार्तील मगनसंग्रहालयासमोर कारमध्येच दुकान थाटून विक्री चालविली आहेबेरोजगारीची समस्या असल्याने नोकरी मिळणे सहज शक्य नाही. अशातच नोकरीच्या प्रतिक्षेत वेळ घालविण्यात काही अर्थ नसल्याने आम्ही दोन्ही भावंडांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. खरबुजाची लागवड करुन एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यातून वडीलांनी आमच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आम्ही फेडणार आहे.- रजत पुरुषोत्तम उईके, युवा शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती