शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 15:24 IST

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.

ठळक मुद्देखरबुजाच्या पिकाने जीवनातही आला गोडवाशेतीतील प्रयोग इतरांसाठी ठरतेय प्रेरणादायी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शेतकरी पित्याने दोन्ही मुलांना चांगले संस्कार देत शिक्षणासाठी शेतात रक्त आटवले. मुलांना उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता कर्ज काढून वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पित्याची ही धडपड पाहून मुलांनीही अभियांत्रिकेची पदवी मिळविली. त्यानंतर नोकरीकरिता प्रयत्न केले पण, नोकरी मिळाली नाही. दोन्ही भावंडांना वडिलांवरील कजार्ची नेहमीच चिंता असायची. म्हणून बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.रजत पुरुषोत्तम उईके व शुभम पुरुषोत्तम उईके, असे या कर्तबगार भावंडाचे नाव आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तम धोंडुजी उईके हे हिंगणघाट तालुक्याच्या जांगोना या गावातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे दहा एकर शेती असून त्यातील पाच एकरामध्ये ओलीताची सोय आहे. या दहा एकराच्या भरोवशावरच पुरुषोत्तम उईके यांनी पाच सदस्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी रजत आणि शुभमला शिकविले. त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड न पडू देता वेळोवेळी कजार्ची उचल करुन दोघांना अभियंता बनविले. थोरला रजत हा सिव्हिल इंजिनिअर तर धाकटा शुभम हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला. आता नोकरीकरुन वडिलांना आधार देण्यासाठी इतर युवकांप्रमाणेच यांनीही मोठ्या शहराकडे धाव घेतली. पण, बेरोजगारीच्या या वावटळीत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी तडख आपले गाव गाठून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात आल्यानंतर घरच्यांना हा निर्णय सांगून दुसºया दिवशीपासून शेतात राबायला सुरुवात केली. जे पीक गावातील इतर शेतकरी घेत नाही व आतापर्यंत घेतलेले नाही ते पीक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. अडीच एकरात खरबुजाची लागवड करीत त्यातून आता एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. या भावंडांच्या या प्रयत्नाला यश आल्याने जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे.शेतातील झोपडीत ठोकला मुक्कामरजत आणि शुभम या मुलांची शेतीत साथ मिळाल्याने वडिलांनाही मोठा आधार मिळाला आहे. त्यांनी खरबुजाची लागवड केल्यापासूनच शेतातच झोपडी टाकून तेथे मुक्काम सुरु केला आहे. आता जैविक खरबुजाचे पिक चांगलेच बहरल्याने या भावंडाची मेहनत फळाला आली आहे. अडीच एकारातून एक दिवसाआड दीड टन खरबूज निघत असून ते बाजारभावानुसार सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे विकले जात आहे. खर्चवजा जाता त्यांना ३५ हजार रुपये मिळत आहे. या पिकातून त्यांना २० ते २२ टन उत्पादनाचा अंदाज असून यातून खर्चवजा जात ५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.लॉकडाऊनमध्ये होम डिलेव्हरीकोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भाजीपाला व फळे विकण्यारिता उत्पादकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रजत व शुभमलाही खरबूज विकण्यासाठी अडचणी जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करीत कल्पकतेच्या सहाय्याने ह्यहोम डिलेव्हरीह्ण हा पर्याय शोधून काढला. खरबुजाची व्यवस्थित पॅकींग करुन ते घरोघरी पोहोचविले जात आहे. यासोबतच त्यांनी वध्यार्तील मगनसंग्रहालयासमोर कारमध्येच दुकान थाटून विक्री चालविली आहेबेरोजगारीची समस्या असल्याने नोकरी मिळणे सहज शक्य नाही. अशातच नोकरीच्या प्रतिक्षेत वेळ घालविण्यात काही अर्थ नसल्याने आम्ही दोन्ही भावंडांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. खरबुजाची लागवड करुन एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यातून वडीलांनी आमच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आम्ही फेडणार आहे.- रजत पुरुषोत्तम उईके, युवा शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती