शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 15:24 IST

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.

ठळक मुद्देखरबुजाच्या पिकाने जीवनातही आला गोडवाशेतीतील प्रयोग इतरांसाठी ठरतेय प्रेरणादायी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शेतकरी पित्याने दोन्ही मुलांना चांगले संस्कार देत शिक्षणासाठी शेतात रक्त आटवले. मुलांना उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता कर्ज काढून वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पित्याची ही धडपड पाहून मुलांनीही अभियांत्रिकेची पदवी मिळविली. त्यानंतर नोकरीकरिता प्रयत्न केले पण, नोकरी मिळाली नाही. दोन्ही भावंडांना वडिलांवरील कजार्ची नेहमीच चिंता असायची. म्हणून बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.रजत पुरुषोत्तम उईके व शुभम पुरुषोत्तम उईके, असे या कर्तबगार भावंडाचे नाव आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तम धोंडुजी उईके हे हिंगणघाट तालुक्याच्या जांगोना या गावातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे दहा एकर शेती असून त्यातील पाच एकरामध्ये ओलीताची सोय आहे. या दहा एकराच्या भरोवशावरच पुरुषोत्तम उईके यांनी पाच सदस्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी रजत आणि शुभमला शिकविले. त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड न पडू देता वेळोवेळी कजार्ची उचल करुन दोघांना अभियंता बनविले. थोरला रजत हा सिव्हिल इंजिनिअर तर धाकटा शुभम हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला. आता नोकरीकरुन वडिलांना आधार देण्यासाठी इतर युवकांप्रमाणेच यांनीही मोठ्या शहराकडे धाव घेतली. पण, बेरोजगारीच्या या वावटळीत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी तडख आपले गाव गाठून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात आल्यानंतर घरच्यांना हा निर्णय सांगून दुसºया दिवशीपासून शेतात राबायला सुरुवात केली. जे पीक गावातील इतर शेतकरी घेत नाही व आतापर्यंत घेतलेले नाही ते पीक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. अडीच एकरात खरबुजाची लागवड करीत त्यातून आता एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. या भावंडांच्या या प्रयत्नाला यश आल्याने जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे.शेतातील झोपडीत ठोकला मुक्कामरजत आणि शुभम या मुलांची शेतीत साथ मिळाल्याने वडिलांनाही मोठा आधार मिळाला आहे. त्यांनी खरबुजाची लागवड केल्यापासूनच शेतातच झोपडी टाकून तेथे मुक्काम सुरु केला आहे. आता जैविक खरबुजाचे पिक चांगलेच बहरल्याने या भावंडाची मेहनत फळाला आली आहे. अडीच एकारातून एक दिवसाआड दीड टन खरबूज निघत असून ते बाजारभावानुसार सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे विकले जात आहे. खर्चवजा जाता त्यांना ३५ हजार रुपये मिळत आहे. या पिकातून त्यांना २० ते २२ टन उत्पादनाचा अंदाज असून यातून खर्चवजा जात ५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.लॉकडाऊनमध्ये होम डिलेव्हरीकोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भाजीपाला व फळे विकण्यारिता उत्पादकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रजत व शुभमलाही खरबूज विकण्यासाठी अडचणी जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करीत कल्पकतेच्या सहाय्याने ह्यहोम डिलेव्हरीह्ण हा पर्याय शोधून काढला. खरबुजाची व्यवस्थित पॅकींग करुन ते घरोघरी पोहोचविले जात आहे. यासोबतच त्यांनी वध्यार्तील मगनसंग्रहालयासमोर कारमध्येच दुकान थाटून विक्री चालविली आहेबेरोजगारीची समस्या असल्याने नोकरी मिळणे सहज शक्य नाही. अशातच नोकरीच्या प्रतिक्षेत वेळ घालविण्यात काही अर्थ नसल्याने आम्ही दोन्ही भावंडांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. खरबुजाची लागवड करुन एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यातून वडीलांनी आमच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आम्ही फेडणार आहे.- रजत पुरुषोत्तम उईके, युवा शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती