शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

विविधतेत एकतेमुळेच भारतीय लोकशाही मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:02 IST

भारतात विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ असतानाही भारत देश एकसंघ आहे. संविधानाने आपल्या देशातील विविधतेला एकतेत परावर्तीत केले आहे. जगातील अनेक देशात विघटन झाले; पण भारतात अनेक भेद असतानाही हा देश संविधानामुळे टिकून आहे, असे विचार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसंजय आवटे : बापुराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतात विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ असतानाही भारत देश एकसंघ आहे. संविधानाने आपल्या देशातील विविधतेला एकतेत परावर्तीत केले आहे. जगातील अनेक देशात विघटन झाले; पण भारतात अनेक भेद असतानाही हा देश संविधानामुळे टिकून आहे, असे विचार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केले.सहकार महर्षी स्व.बापुराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्यावतीने ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख होते तर उपाध्यक्ष सतीश राऊत, सचिव प्रकाश ढांगे, संचालक डॉ. किशोर अहेर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.आवटे पुढे म्हणाले, भारतीय संविधान भारताच्या लोकांनी स्वत:ला अर्पण केले आहे. इतर देशात लोकांना मतदानाचा हक्क मागावा लागल. मात्र, आपल्या देशात अगदी सुरूवातीपासून मतदानाचा हक्क मिळाला. सर्वसामान्य व्यक्ती हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. शिवाय त्याचा विविधता सर्वसमावेशकता या जीवनमुल्यावर विश्वास आहे. नेहरू, गांधी, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीने लोकशाही अधिक प्रगल्भ झाली आहे. विविधतेने नटलेल्या या देशात आम्ही भारताचे लोक सौख्याने नांदत आहे. हेच लोकशाहीचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंतची वाटचाल तरूणांना समजावून सांगणे गरजेचे असल्याचेही सरतेशेवटी त्यांनी सांगितले.प्रा. सुरेश देशमुख यांनी स्व. दाआजींच्या कतृर्त्वावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागात शिक्षणाची पायमुळे रूजवून आज ग्रामीण जीवन उंचावण्याचे महत्वाचे कार्य दाआजींनी केल्याचे ते म्हणाले. वर्धा जिल्ह्यात सर्व सत्तास्थाने काबीज करून काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत केल्याचे ते त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व अतिथीचा परिचय प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी करून दिला.स्व. बापुरावजी देशमुख महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होळपळत असताना शासनाला ३२५ कोटींची मदत करून दिल्याचा उजाळा करून दिला.ग्रामीण भागात जोपर्यंत शिक्षणाचे व्दार उघडल्या जाणार नाही. तोपर्यंत विकास साध्य होणार नाही, हा दृष्टीकोन जोपासुन त्यांनी जिल्ह्यातील खेड्यागावात शाळा सुरू केल्याचे देशमुख म्हणाले. संचालन प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सतीश राऊत यांनी मानले.