शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाअभावी पेयजल योजना रखडली

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता शासमाकडून राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत आहे.

वर्धा : गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता शासमाकडून राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत आहे. परंतु ही योजना कार्यान्वित करण्याकरिता गावातील नागरिकांकडे ९० टक्के शौचालय असण्याची अट आहे. शासनाचे उदासीन धोरण व विलंबाने मिळणाऱ्या अनुदानामुळे ही योजना रखडली असल्याची स्थिती जिल्ह्यातील काही गावात निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील गौळ येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम करण्यात येत आहे. यातील जलकुभांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या गावात पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. येथील बहुतांश नागरिकांकडे स्वतंत्र शौचालय नाही. या योजनेअंतर्गत नागरिकांना शौचालय बांधकामाकरिता दहा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. परंतु काही शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही अनुदान प्राप्त झाले नाही. शौचालयाची संख्या कमी असल्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबाची संख्या पाहता याचा लाभ मिळण्यात व्यत्यय येत आहे. सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. अतिक्रमणधारकांना शौचालयाकरिता दिलेली जागा बळकावली असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे, याकरिता कारवाई गरजेची झाली आहे. परिणामी ग्रामपंचायत प्रशासनाला अनुदान मिळत नाही. गावात अतिक्रमणधारक कुटुंबाची संख्या ६१ आहे. गावात ४५१ कुटुुंबे असून ३१९ कुटुंबांकडे शौचालय नाही. केवळ ७१ कुटुंबांकडे शौचालय आहेत. अतिक्रमण केलेल्या ६१ कुटुंबाना शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता अनुदान मिळणार नसल्यामुळे ही कुटुंबे शौचालयापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. ६० लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या योजनेचा बोजवारा वाजू नये याकरिता शासनाने अतिक्रमण केलेल्या कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालय बांधून देण्याची मागणी पुढे येत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या दहा हजार रुपयांमध्ये शौचालय उभारणे शक्य नाही. शौचालय बांधण्याकरिता ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. यापूर्वी ५०० रुपये अनुदानावर नागरिकांनी सरसकट शौचालय उभारले, परंतु त्यापैकी आज एकही शौचालय सुस्थितीत नाही. शासनाने या अनुदानात वाढ करुन ३० हजार रुपये करावे, अशी मागणी आहे. गरीब कुटुंबाकरिता पुरुष व महिलांचे वेगळे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे. त्यामुळे ही योजना मार्गी लागून योजनेअंतर्गत नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत अनुदानात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)