शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गसंहारक विकास नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेवून विकास कामे करावी, अशी मागणी शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनातून केली.

ठळक मुद्देक्रांतिदिनी पर्यावरणप्रेमींचा एल्गार : वृक्षतोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलनाचा निवेदनातून इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांना गती दिल्या जात आहे. यातूनच रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी परिसरातील डेरेदार वृक्ष आडवे केले जात आहेत. जवळपास ७० वृक्ष जमीनदोस्त केले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याने ‘हा निसर्गसंहारक विकास नकोच’ अशी भूमिका घेत क्रांतिदिनी वर्ध्यातील पर्यावरणप्रेमी एकत्र आले. त्यांनी ही वृक्ष तोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेवून विकास कामे करावी, अशी मागणी शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनातून केली. यादरम्यान चर्चा करण्यात आली; पण त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. रविवारी सकाळी या मार्गावर पुन्हा वृक्षतोड सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांनी धाव घेत वृक्षतोड थांबविली. यावेळी डॉ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, सुषमा शर्मा, संजय इंगळे तिगावकर, डॉ. नितीन गगणे, सुचि सिन्हा, डॉ. विठ्ठल साळवे, डॉ. अजित प्रसाद जैन, डॉ. ओमप्रकाश गुप्ता, ओजस सु.वि., मुरलीधर बेलखोडे, डॉ. विभा गुप्ता, डॉ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डॉ. लोकेश तमगिरे, डॉ. सोनू मोर, डॉ. प्रणाली कोठेकर, डॉ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अव्दैत देशपांडे, प्रभाकर पुसदकर, डॉ. आलोक बंग, डॉ. अनुपमा गुप्ता, दिलीप विरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, अतुल शर्मा, अनिल फरसोले, निरंजना मारु, अ‍ॅड. पूजा जाधव, अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, मुकेश लुतडे, जीवन अवथरे, किशोर अमृतकर, शरद ताकसांडे, भाग्यश्री उगले, मोहित सहारे, गुरुराज राऊत, वरुडचे सरपंच वासुदेव देवढे याच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.रस्ता रुंदिकरणाकरिता १६० वृक्ष तोडायची आहेत. रस्त्याच्या मधात झाड राहिले तर ते अपघातास कारण ठरु शकते. पर्यावरणप्रेमींच्या भावना समजून घेत पुन्हा पाहणी करुन किती वृक्ष वाचविता येतात, हे बघून पुढील कार्यवाही करणार. तसेच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत अधिक वृक्ष लावली जातील.गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागशनिवारला मोठ्या प्रमणावर झाडे तोडण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीने हे योग्य नाही. पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन दिले आणि झाडे तोडण्याची प्रक्रिया थांबविण्यास सांगितले. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या स्वीय सहाय्यकाने याबाबत आश्वस्त केले.सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन, सेवाग्रामबापू कुटी-सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटना सातत्याने करीत आहेत. मात्र, प्रशासन वृक्षतोड करुन जागतिक वारसा स्थळासाठी आवश्यक निकषांना तिलांजली देत आहे. ज्या महात्मा गांधींनी अतिरेकी विकासाला नाकारत वृक्ष संवर्धनाला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करुन साजरा करण्यात येतो, ही अत्यंत खेदाची बाब आहे.संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशनसेवाग्राम परिसरातील दीर्घजीवी वृक्षांची होणारी कत्तल ही अस्वस्थ करणारी आहे. वीस वर्षांपूर्वी निसर्ग सेवा समिती व बापूराव देशमुख स्मारक समिती द्वारे लावलेल्या असंख्य वृक्षांची एकाच दिवशी कत्तल करण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. या वृक्षतोडीमुळे पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. जैव विविधता, वन, वन्यप्राणी यांच्या संवर्धनासाठी आम्ही विकासाच्या मॉडेल पुढे कमी पडतो आहे.मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती

टॅग्स :environmentपर्यावरणSewagramसेवाग्राम