शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खाणपट्ट्यांना ‘नाहरकत’ प्रमाणपत्रास नकार

By admin | Updated: December 15, 2014 23:06 IST

गिट्टी खदाणीत ब्लास्टींग केले जात असल्याने घरांचे, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ यामुळे खाणपट्टा देण्यात येऊ नये, खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी येसंबा

येसंबा ग्रामपंचायतीने घेतला ठराव : जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित मंत्र्यांना निवेदन
वर्धा : गिट्टी खदाणीत ब्लास्टींग केले जात असल्याने घरांचे, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ यामुळे खाणपट्टा देण्यात येऊ नये, खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी येसंबा येथील ग्रामस्थांनी केली़ ग्रामपंचायतीने ही मागणी मान्य करीत ग्रामसभेत ठराव पारित केला आहे़ या ठरावाच्या प्रती तलाठ्यासह जिल्हाधिकारी आणि संबंधित मंत्र्यांना सादर केल्या़ येसंबा परिसरातील खाणपट्ट्यांचे नुतनीकरणही करण्यात येऊ नये, अशी मागणीही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केली आहे़
गौण खनिज उत्खननास सध्या उधान आले आहे़ झटपट श्रीमंत होण्याच्या नादात परवानगीपेक्षा अधिक उत्खनन करून पर्यावरणास धोका निर्माण केला जात आहे़ खाणपट्ट्यांचे नुतनीकरण न करता शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे़ वर्धा जिल्ह्यात गतवर्षीपर्यंत बहुतांश खदाणी नुतनीकरण न करताच सुरू होत्या़ यात शासकीय महसूल बुडाला असून मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन करण्यात आल्याने पर्यावरणासही धोका निर्माण झाला आहे़ या खाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टींगमुळे येसंबा व परिसरातील गावांत घरांचे नुकसान होत आहे़ शिवाय पिकांचे नुकसान होत असून जनावरेही चारा खाऊ शकत नाहीत़ खाणपट्ट्यांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोक्यात निर्माण झाला आहे़ शिवाय पर्यावरण धोक्यात आले आहे़ खाणपट्टा व के्रशरमधून निघणाऱ्या धूळीमुळे पिकांवरही दुष्परिणाम होत आहे़ के्रशरमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतातून काही पिकेल, ही अपेक्षाच राहिलेली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसानही सहन करावे लागत आहे़
खाणपट्टा व क्रेशरमुळे त्रस्त झालेल्या येसंबा येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत खाणपट्ट्याची परवानगी कुणालाही देण्यात येऊ नये, गिट्टी खदाणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, संबंधितांना वीज जोडणीही देण्यात येऊ नये आणि भविष्यात पूर्वीपासून असलेल्या खाणपट्टा धारकांच्या खाणींचे नुतनीकरण करणे कायम बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ येसंबा ग्रामपंचायतीनेही ९ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव पारित केला आहे़ ठरावाच्या प्रती तलाठी, तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या मंत्र्यांनाही पाठविल्या आहेत़ यात मातीच्या उत्खननाची परवानगी कुणालाच देण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आलेली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)