शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

४० गावांत ६५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता : नदी-नाले तुडूंब

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील पंधरवड्यापासून आर्वीसह तालुक्यात संततधार पावसाने कहर केल्याने तालुक्यातील ४० गावांतील ६५९ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.अतिवृष्टीचा आर्वीसह तालुक्यातील बाजारवाडा, नांदपूर, खुबगाव, अहमदपूर, लाडेगाव, एकलारा, शिरपूर, देऊरवाडा, लाडेगाव, सर्कसपूर, राजापूर, अहिरवाडा, मारोडा, धनोडी, वर्धमनेरी, मांडला, सावळापूर, दहेगाव (मु.), हरदोली, रोहणा, वडगाव (पांडे), गुमगाव, नांदोरा, पाचेगाव, धनोडी, कवाडी, गव्हाणखेडी, पिंपळखुटा चिंचोली (डांगे), पाचोड, टाकरखेड, जळगाव, वाढोणा, निंबोली (शेंडे), इठलापूर, वागदा, वाढोणा, अल्लीपूर, टोणा आदी गावांना फटका बसला आहे. यात नदीकाठच्या शेतातील पिके पुराच्या पाण्याने खरडून गेल्याने नुकसानीची आकडेवारी अधिक आहे. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५९ हेक्टर मधील कापूस, सोयाबीन, तूर, फळवर्गीय पिके आदींचा समावेश आहे. कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. कृषी विभागाने पाठविलेल्या शेतपिकाच्या नुकसानीच्या सर्व्हेत वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यातील ४० गावांतील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर