शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

४०० हेक्टरवरील पिके गेली खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

मौजा जुना अंतोरा येथील शेतकरी प्रशांत पांडे यांच्या सर्व्हे नंबर १४६ मधील शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे सोयाबीन आणि तुरीचे पीक वाहून गेले. मौजा चिंचोली येथील शेतकरी अमोल अमझरे यांचे शेत सर्व्हे क्रमांक १३५ खरडून गेल्यामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे.

ठळक मुद्देआष्टी तालुक्यात पावसाचा कहर : घरांची पडझड, महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : आष्टीसह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक गावांतील घरांचे व मौजातील शेतपिकांचे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत तालुक्यात ४०० हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली. यात कपाशी, तूर, सोयाबीन ही प्रमुख खरिपाची पिकेही वाहून गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी आलेले नाही, अशी माहिती आष्टी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी केला आहे.मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरण ९५.७९ टक्के भरले आहे. नदीकाठावरील बेलोरा, गोदावरी, टेकोडा, भारसवाडा, भिष्णूर, खडका, बेलोरा खुर्द, चिंचोली, शिरसोली, अंतोरा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अप्पर वर्धा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गेल्या आठवडाभरात अप्पर वर्धा धरण पूर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे.मौजा जुना अंतोरा येथील शेतकरी प्रशांत पांडे यांच्या सर्व्हे नंबर १४६ मधील शेतात मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे सोयाबीन आणि तुरीचे पीक वाहून गेले. मौजा चिंचोली येथील शेतकरी अमोल अमझरे यांचे शेत सर्व्हे क्रमांक १३५ खरडून गेल्यामुळे कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे.मौजा चिंचोली येथील शेतकरी लोमेश मानकर यांच्या सर्र्व्हे क्र. ९९/१ वाघाडी नाल्याच्या पुरामुळे चार एकर शेतातील कपाशीचे पीक पूर्णपणे खरडून गेलेले आहे. तालुका कृषी विभागाने वाघाडी नाला खोलीकरणाचे काम जलयुक्त शिवार अभियानमधून केले. मात्र, काम किती मीटर खोल केले, याची कुठलीही माहिती कृषी विभागाने दिली नाही. या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळे पुराचे पाणी येताच नाल्याने न वाहता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि गावातील घरांमध्ये शिरले. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांची पडझड झालेली आहे. मात्र, कृषी विभागाने कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. अंतोरा, लहानआर्वी या भागामध्ये सर्वाधिक शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. शेती पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केलेली आहे.पावसाने खोळंबली शेतीकामेघोराड - सुरुवातीच्या नक्षत्रात पावसाने दांडी मारल्याने यंदाचा खरीप हंगाम कसा होणार याची चिंता वाटू लागली होती; पण सततचा पाऊस सुरू असल्याने पुन्हा त्या चिंतेत भर पडली आहे. शेतीच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे.पट्टा पद्धतीची कपाशीची पेरणी असल्याने व सततच्या पावसामुळे डवरणी होऊ शकत नाही. अशातच शेतातील पीक निंदण करण्यासाठी मजूर कसे न्यावे, ही विवंचना आहे. मजूर शेतात पोहोचताच पाऊस येत असल्याने घरी परतावे लागते. अशातच शेतात जाण्यायेण्याचा खर्च व अर्धी मजुरी द्यावे लागत असल्याने आता शेतकºयांनी तणनाशकाचा वापर सुरू केला आहे. कपाशीला रासायनिक खताची मात्रा देण्यासही अडचण निर्माण होत आहे. शेतात असलेल्या पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीपालावर्गीय पिकाचे उत्पादन कमी झाले आहे, तर सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या आहे. सततच्या पावसाने शेंगांची काय परिस्थिती होईल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.श्रावणमासाला सुरुवात झाली तेव्हापासून तर आज एक महिन्याहून अधिक काळ झाला असताना पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर पावसामुळे शेतात काम करणाºया मजूरवर्गाला पाहिजे त्या प्रमाणात काम नाही. यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कटत आहे.एकंदरीत या पावसामुळे शेतातील कामांचा खोळंबा व शेतातील पिकापासून मिळणारे उत्पादन व उत्पन्न हाती येणार की नाही, या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.नुकसानाचा आकडा फुगतोयजिल्ह्यात यंदा उशिराने पावसाने आगमन झाले. काही भागात अद्याप संततधार सुरूच आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक नद्यांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने हे पाणी थेट शेतात अथवा गावांमध्ये शिरत आहे. यात पिकांचे नुकसान तर घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अनेक भागातील हजारो हेक्टरमधील पिके खरडून वाहून गेली आहेत. तर संततधारेमुळे काही शेतात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. पीक पाण्याखाली आल्याने जळाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्याप शासकीय यंत्रणेकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली नाही. शेतकºयांना सर्वेक्षणाची याशिवाय आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील पीक व अन्य नुकसानाचा आकडा दिवसेंदिवस फुगत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाºयांनी सर्वेक्षणाबाबात संबंधित यंत्रणेला निर्देश देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती