शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

जात पंचायतीची दहशत; वर्धा जिल्ह्यातील कुटुंबावर नऊ वर्षांपासून बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 2:20 PM

जात पंचायतीच्या जाचामुळे मागील नऊ वर्षांपासून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रमेश धुमाळ यांचा परिवार दहशतीत जीवन जगत आहे.

ठळक मुद्देसमाजाकडून मानसिक छळ कुटूंबियांवर जातबांधवांनी घातला सामुहिक बहिष्कार

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जात पंचायतीच्या जाचामुळे मागील नऊ वर्षांपासून वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील रमेश धुमाळ यांचा परिवार दहशतीत जीवन जगत आहे. समाजातील पंचायतीपुढे अनेकदा विनंत्या करूनही समाजाने त्यांच्यावरील सामूहिक बहिष्कार मागे न घेतल्याने धुमाळ यांची समाजातच मोठी कोंडी करण्यात आली आहे. याविरूध्द आता कायदेशीर लढा लढण्याचा निर्णय धुमाळ यांनी घेतला आहे.२१ फेब्रुवारी २०१० रोजी रमेश धुमाळ यांचे लग्न झाले. यावेळी समाजाचे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु कालांतराने त्यांच्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील (गोंधळी जोशी) समाजातील पंचमंडळींनी रमेश व त्यांचे सासरकडील मंडळीवर सामाजिक बहिष्कार टाकला. याबाबत रमेश यांनी चौकशी केली व समाजातील लोकांना विचारले तर तुझ्या सासऱ्याला बाट आहे, तुझी सासू समाजाची नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दंड ठोठावला आहे. आणि तू त्या कुटूंबातील मुलगी केली असल्यामुळे तूही गुन्हेगार आहे. म्हणून तुलाही बहिष्कृत करण्यात येत आहे. तुला दंड भरावा लागेल, असा दम दिला. त्यानंतर समाजाच्या या भूमिकेमुळे हादरलेल्या रमेश यांनी रायपूर (छत्तीगड) येथील जात पंचायतीमध्ये हजेरी लावली. तेथे रमेश व त्यांच्या सासरकडील मंडळींवर प्रत्येक पाच हजार रूपये असा दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी घाबरलेल्या स्थितीत त्यांनी दहा हजार रूपये दंड भरण्याची तयारी दाखविली. परंतु त्यांना दंड भरू न देण्यासाठी परावृत्त करण्यात आले व आता जास्त गावांची मंडळी आलेली नाही. जेव्हा ती येईल, तेव्हा न्याय करू असे सांगण्यात आले. त्या दिवसापासून आजपर्यंत न्यायासाठी याचना करीत असलेल्या रमेश धुमाळ यांना न्यायच मिळालेला नाही. जात पंचायतीच्या अनेक सदस्यांकडे चकरा करून विनंती केली. परंतु ते पंच मानण्यासाठी तयार नाही. या जात पंचायतीत नागपूर येथील तीन, अकोला येथील दोन व बिलासपूर (छत्तीसगड) येथील एका पंचाचा समावेश असल्याची माहिती धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गावोगावी जात पंचायतीत बोलावून अपमानित करण्याचे काम समाजाकडून सुरू असल्याचे रमेश धुमाळ यांनी सांगितले. आपल्याला सन्मानाची वागणूक समाजातच मिळाली पाहिजे. यासाठी आपण आता लढा देण्याचा निश्चय केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रकरणात तक्रार शासनाने दाखल करून घेवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.२०१० पासून आपल्यावर व आपल्या सासरकडील मंडळीवर समाजाने सामूहिक बहिष्कार घातला आहे. दहा हजाराचा दंड ठोठावला. तो भरण्याची तयारीही जात पंचायतीसमोर दाखविली. मात्र तो भरू नये यासाठी ठिकठिकाणी आम्हाला जात पंचायतीसमोर बोलाविले जात आहे व अपमानीत केले जात आहे. समाजाच्या दहशतीमुळे आजवर आम्ही यासंदर्भात तक्रारही केली नाही. मात्र आता असह्य त्रास होत असल्याने कायदेशीर लढा लढण्याचा निश्चय आपण केला आहे. यासाठी इतर समाजाने आम्हाला साथ द्यावी.- रमेश धुमाळ, पिडीत, देवळी, जि. वर्धा

टॅग्स :Governmentसरकार