शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

प्रवाशांच्या सेवेत घाणेरड्या बसेस

By admin | Updated: August 22, 2016 00:29 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, हे ब्रीद मिरविले जाते;

दुर्गंधीचा प्रवास : सुरक्षेची हमी राहिली कागदावरचवर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, हे ब्रीद मिरविले जाते; पण सध्या एसटीचा प्रवास तापदायक ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या असून प्रवाशांच्या सेवेत अस्वच्छ बसेस असल्याचे दिसून येते. परिणामी, दुर्गंधीचा प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस फेऱ्या करून आल्यानंतर स्वच्छ करणे गरजेचे असते. परिवहन महामंडळाकडे तत्सम यंत्रणा कार्यरत आहे. असे असले तरी बहुतांश बसेस स्वच्छ न करताच पुन्हा प्रवासाकरिता पाठविल्या जातात. परिणामी, प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वातावरणात बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. पुलगाव, आर्वी आणि हिंगणघाट आगारातून सुटणाऱ्या बहुतांश बसेस अस्वच्छ राहत असल्याचेच दिसून येते. पुलगाव आगारातील बसेसमध्ये चालकाच्या ‘कॅबीन’मध्ये खर्रा पन्नी, पाण्याच्या रिकाम्या ‘क्रश’ केलेल्या बाटल्या, बिस्कीटच्या पुड्यांचे ‘रॅपर’ यासह अनेक कचरायुक्त ‘वेस्ट’ साहित्य दिसून येते. चालकाची कॅबीन कधीही साफ केली जात नसल्याप्रमाणेच बरबटलेली दिसून येते. हा परिसर धुळीने माखलेल्या अवस्थेत दिसून येतो. याच ठिकाणी चालकांना आपले जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, सोबत आणलेली ‘बॅग’ यासह अन्य वस्तू ठेवाव्या लागतात. परिणामी, चालकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय काही चालक बसमधूनच पिचकाऱ्या मारताना आढळून येतात. यामुळेही चालक कॅबीनमध्ये घाण साचत असून दुर्गंधी पसरते. याचा सामना चालक, वाहकासह संपूर्ण प्रवाशांना करावा लागतो. बहुतांश बसेसमध्ये दिसत असलेला हा प्रकार दूर करण्याकरिता अधिकारी, कर्मचारी कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. आगारामध्ये बसेस साफ करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. प्रवासावरून आलेल्या बसेस पाण्याने धुवून स्वच्छ केल्या जातात; पण यातही दिरंगाईच केली जात असल्याने त्या धुतल्या की नाही, हा प्रश्नच पडतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना सुखकर प्रवासाची हमी देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)प्रथमोपचार पेट्या झाल्या हद्दपारप्रवासामध्ये अपघात झाल्यास प्रवाशांवर प्रथमोपचार करता यावे म्हणून पूर्वी बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या ठेवण्यात येत होत्या. असे असले तरी बहुतांश बसेसमधील प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये केवळ अगरबत्ती, माचिस यासह अन्य कचराच आढळून येत होता. उपचार करण्याचे साहित्य मात्र दिसतच नव्हते. यामुळे या पेट्या केवळ देखावाच ठरत होत्या. या पेट्यांचा उपयोगच होत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर महामंडळाद्वारे त्या पेट्या काढण्यात आल्या. आता वाहकाजवळ प्रथमोपचाराचे साहित्य दिले जात असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी हे साहित्य वाहक खरोखर घेऊन फिरतात काय, हा प्रश्नच आहे. आजही काही बसेसमध्ये प्रथमोपचाराच्या पेट्या आढळून येतात; पण यात उपचाराचे साहित्य दिसत नाही. या पेट्यांमध्ये कचराच साचलेला असतो. काही बसेसमध्ये तर सर्रास खर्रा ठेवण्यासाठी या पेट्यांचा वापर होत असल्याचे पाहावयास मिळाले.दुरूस्तीकडेही कानाडोळाप्रवासावरून आल्यानंतर बसेसची तपासणी केली जाते. काही प्रसंगी परिवहन महामंडळाचे मेकॅनिक बसस्थानकावर येऊन बससेची तपासणी करतात तर बहुतांश बसेस गॅरेजमध्ये पाठविल्या जातात; पण अनेकदा बसेसच्या दुरूस्तीकडे कानाडोळाच केला जातो. यामुळे भंगार व खिळखिळ्या झालेल्या बसेस मधेच बंद पडतात. परिणामी, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.