शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! बोगस बीटी बियाणे बाजारात

By admin | Updated: May 30, 2016 01:46 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यात बियाण्यांकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याने त्यांची फसवणूक करण्याकरिता अनेक बोगस कंपन्यांची बियाणे बाजारात येत आहेत. वर्धेत तशी बियाणे येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या खरेदीकरिता धावपळ सुरू होत आहे. अशात काही बोगस कंपन्या आपली तुमडी भरण्याकरिता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास मागे राहत नाही. वर्धेतही तशी बियाणे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला मिळाली आहे. यात सर्वाधिक बियाणे कपाशीची राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाशक्ती, आर. आर. बीटी किंवा बी जी ३ या नावाने बोगस बियाणे बाजारात येण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे कळविले आहे.

जिल्ह्याला हवी बीटी बियाण्यांची १० लाख पाकिटे
कपाशीच्या अपेक्षित पेरणीच्या नियोजनानुसार जिल्ह्याला बीटी कापूस बियाण्यांच्या १० लाख ८ पाकिटाची आवश्यकता आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ६ लाख ६६ हजार पॉकिटाचा पुरवठा झालेला आहे. पेरणीच्या वेळापर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार असून कपाशी बियाण्याचा तुटवडा व टंचाई जाणवणार नाही, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस. एम. खळीकर यांनी कळविले आहे.
जिल्ह्यामध्ये सोयाबीनची बियाणे उपलब्ध होणार
१ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन असल्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. त्याकरिता ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक व खासगी कंपनीचे ६० हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
सोयाबीन पेरताना सहा ओळीनंतर एक ओळ तूर ठेवा
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून यंदाच्या हंगामात सोयाबीनची पेरणी करताना सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांनी ६ ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपीक घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल व आपातकालीन परिस्थितीत तूर आंतरपीक घेतल्यामुळे फायदाही होईल, असे कृषी तज्ज्ञांकडून कळविण्यात आले आहे. मान्यताप्राप्त कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करा
मागणीच्या तुलनेत बिटीची कमी पाकिटे
वर्धा : बियाण्यांबाबत होत असलेली फसगत टाळण्याकरिता जिल्ह्यात कृषी विभागाकडून मान्यताप्राप्त असलेल्या दुकानांकडून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी विभागाकडून मान्यता असलेले एकूण ८५० दुकाने असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. बियाण्यांची, खतांची व किटकनाशकांची खरेदी करताना ती सीलपॅक आहेत अथवा नाहीत, याची तपासणी करावी. यात कुणी दुकानमालक कुचराई करीत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागाकडे करावी, असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)