शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संगोपनाचे केले ‘फेक’ सर्वेक्षण

By admin | Updated: June 23, 2017 01:29 IST

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत मागील काही वर्षांपासून शासन वृक्षारोपणावर भर देत आहे.

खड्ड्यांमध्ये काड्या : जिवंत रोपांची संख्या नगण्यप्रशांत हेलोंडे। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेत मागील काही वर्षांपासून शासन वृक्षारोपणावर भर देत आहे. मागील वर्षी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पदाधिकारी यांना उद्दीष्ट देत वृक्षारोपण करण्यात आले. आज एक वर्षाने या रोपांचे सर्वेक्षण करण्यात आले; पण हा सर्व्हे केवळ फेक असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. प्रत्यक्षात नगण्य झाडे जिवंत असताना ९६ टक्के वृक्ष जगल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील वर्षी शासनाने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातही १० लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. याबाबत नियोजन करून प्रत्येक विभागाला रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. वन व सामाजिक वनिकरण विभागासह काही सेवाभावी संस्थांनी आपली जबाबदारी नेटाने पार पाडली. वन व वनिकरण तसेच सेवाभावी संस्थांची रोपे जगली; पण अन्य सरकारी कार्यालयांकडून करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचे तीनतेराच झाले आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या रोपट्यांचीही धुळधाण झाली आहे. झाडांसाठी खोदलेले खड्डे आहेत; पण त्यातील रोपे बेपत्ता आहे. काही आहे ती कोमेजली आहे. असाच प्रकार जिल्ह्यात अन्य ठिकाणीही पाहावयास मिळतो. मागील वर्षी महसूल विभागाने १६६५ रोपांची लागवड केली तर त्यातील १५५० झाडे जगल्याची अहवालात नोंद आहे; पण प्रत्यक्षात जिल्हाधिकारी, तहसील, उपविभागीय अधिकारी व अन्य कार्यालय परिसरात लावलेली रोपेही दिसत नाहीत. सर्वाधिक ४ लाख ९९ हजार २ रोपांची लागवड वन विभागाने केली. यातील ४ लाख ९६ हजार ३५० रोप जगल्याचे नमूद आहे. सामाजिक वनिकरणने २० हजार रोपे लावली व १९ हजार ७२० रोपे जगल्याची नोंद आहे. जिल्हा परिषदेची २ लाख १४ हजार ९१६ पैकी १ लाख ९७ हजार ३३३ तर कृषी विभागाची २१ हजार ९२४ पैकी १६ हजार ५२० झाडे जगल्याची नोंद आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ७ लाख ६४ हजार २१७ वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. यापैकी अहवालानुसार ७ लाख ३५ हजार ९०३ रोपे जगल्याचे सांगण्यात आले आहे. याची टक्केवारी ९६.३० असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, हजारो झाडे लावण्यातच आली नाही. शाळा, महाविद्यालयांच्या वृक्षारोपण मोहिमेचा फज्जाच उडाला असून अन्य विभागांतही बोंबच आहे. वृक्ष संगोपनासाठी आवाहनमागील वर्षी जिल्हा प्रशासनाकडून ७.६४ लाख रोपांची लागवड करण्यात आली. सर्वेक्षणात ९६ टक्के रोपे जगल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात हा आकडा अत्यल्प आहे. यामुळेच यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांना संगोपनासाठी आवाहन करावे लागत आहे. कमी वृक्षांची लागवड करा; पण त्यांचे संगोपन करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी बैठकीत केले आहे. मागील वर्षीच्या वृक्षारोपणाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ९६ टक्के रोपे जगली ती वन व सामाजिक वनिकरणची आहे. फॉरेस्ट, नॉनफॉरेस्ट व लोकसहभाग या प्रकारांत वृक्ष लागवड झाली होती. यामुळे झाडे जगल्याचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.