शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या कृपादृष्टीने बळीराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपिकांना संजीवनी : जिल्ह्यात ७३.२३ मि.मी.पावसाची नोंद, नदी-नाल्यांना आला पूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतीपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू होती. काही भागात सिंचनाच्या माध्यमातून पिकांना जगण्याचा आधार दिला जात होता. अशातच बुधवारी रात्रीपासून वरुणाची कृपादृष्टी झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्याही काहीसा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुका वगळता इतर सहाही तालुक्यामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात एकूण ७३.२३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सेलू तालुक्यात २१.४० मि.मी. तर समुद्रपूर तालुक्यात १७.३८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतशिवारात पाणी साचले आहे. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही प्रभावित झाली होती. सेलू तालुक्यातील बोर नदीला पूर आल्याने जयपूर येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या गावातील नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. त्यांना पूर ओसरेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ठिकाणी निर्माण झाली होती. 

सिंदी-दहेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प- सिंदी (रेल्वे): बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजतापासून सुरु झालेल्या पावसामुळे सिंदी-दहेगाव मार्गावरील पिपरा गावातील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळेपर्यंत ठप्प झाली होती. थोडाही पाऊस आला तरी या नाल्याला पूर येत असल्याने नांगरिकांसह शेतकऱ्यांना दरवर्षीच पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. येथील नारिकांनी अनेकदा या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी आमदार, खासदारांसह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने समस्या कायम आहे. आतातरी ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी होत आहे.

सेवाग्रामातील मेडिकल चौक झाला जलयम- सेवाग्राम: बुधवारी सायंकाळपासून परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान झळकत होते. या पावसामुळे शेतशिवारातील विहीर, नदी, नाले व तलावाच्या पाणीपातळीतही भर पडली आहे. तसेच या पावसामुळे मेडीकल चौकात पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. या पावसातून वाहन काढताना ते आडवे होत होते. या साचलेल्या पाण्यामुळे किरकोळ अपघात होऊन अनेकांच्या अंगावर चिखल उडाल्याने संतापही व्यक्त होत होता. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने पुढे काय? असा प्रश्न दिनेश पवार व दिलीप शेंद्रे आदी नागरिकांनी व्यक्त केला. सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे केली जात असून अद्यापही ती पूर्णत्वास गेलेली नाहीत. मेडीकल चौकातील नालीचे काम आणि रस्त्याचे काम रेंगाळले असल्याने पाणी निघायला जागा नाही. त्यामुळे या चौकात तलाव साचला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी